IPS अधिकारी रश्मी करंदीकर आणि पती पुरुषोत्तम चव्हाण 
मुंबई

पतीकडून मिळालेल्या पैशाबाबत IPS अधिकारी अनभिज्ञ!

आयपीएस अधिकारी रश्मी करंदीकर यांनी आपल्या बँक खात्यात आलेल्या २.६४ कोटी रुपयांची नोंद केली नव्हती. तसेच ही रक्कम त्यांचे वेगळे राहणारे पती पुरुषोत्तम चव्हाण जे प्राप्तिकर परतावा फसवणूक आणि इतर फसवणूक प्रकरणांमध्ये आरोपी आहे त्यांच्याकडून आली होती, असे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या (ईओडब्ल्यू) एका अधिकाऱ्याने शनिवारी सांगितले.

Swapnil S

मुंबई : आयपीएस अधिकारी रश्मी करंदीकर यांनी आपल्या बँक खात्यात आलेल्या २.६४ कोटी रुपयांची नोंद केली नव्हती. तसेच ही रक्कम त्यांचे वेगळे राहणारे पती पुरुषोत्तम चव्हाण जे प्राप्तिकर परतावा फसवणूक आणि इतर फसवणूक प्रकरणांमध्ये आरोपी आहे त्यांच्याकडून आली होती, असे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या (ईओडब्ल्यू) एका अधिकाऱ्याने शनिवारी सांगितले.

ईओडब्ल्यूच्या तपासात चव्हाण आणि करंदीकर यांच्या बँक खात्यांशी संबंधित संशयास्पद व्यवहार आढळून आले. पुढील तपासासाठी ईओडब्ल्यूने पोलीस महासंचालक कार्यालयाला पत्र लिहून करंदीकर यांनी २०१७-२०१८ साठी दिलेल्या वार्षिक उत्पन्न घोषणेची माहिती मागवली.

अधिकाऱ्याने सांगितले, ईओडब्ल्यूने करंदीकर यांनी सादर केलेल्या मालमत्तेच्या घोषणेतील कागदपत्रांचे परीक्षण केले असता, चव्हाणने त्यांच्या बँक खात्यात २.६४ कोटी रुपये जमा केल्याचे आढळले. मात्र, त्यांनी ही रक्कम जाहीर केलेली नव्हती.

करंदीकर यांनी २.६४ कोटी रुपये इंट्रा-डे शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवले होते, मात्र त्यात त्यांना तोटा झाला, असेही अधिकाऱ्याने सांगितले. चौकशीदरम्यान सध्या गृहरक्षक दल आणि नागरी संरक्षण विभागात ईओडब्ल्यूकडून अधीक्षक/प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या करंदीकर यांनी सांगितले की, त्यांच्या बँक खात्याचे व्यवहार त्यांचे पतीच बघत होते.

चव्हाणला ईओडब्ल्यूने ३२ कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी अटक केली होती.

पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा; गुढीपाडव्यापासून १५ डब्यांच्या लोकल वाढणार, १६ उपनगरीय सेवांचे होणार रूपांतर

Gudi Padwa 2026 : उद्या स्वागत यात्रांचा मुंबईभर जल्लोष; गिरगाव, कुर्ला, दादर येथे चित्ररथ, खेळांची पर्वणी

इंदूरमध्ये EV चार्ज करताना शॉर्ट सर्किट; सिलिंडरचा भीषण स्फोट, ७ जणांचा दुर्दैवी अंत

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘रत्नागिरीचा राजा’ शहरात दाखल; हापूसच्या आगमनाने बाजारात सुगंध, दर मात्र दुपटीने वाढले

मध्य रेल्वे २०१२ उन्हाळी विशेष रेल्वे सेवा चालवणार; अतिरिक्त १२० विशेष गाड्या चालविण्याचे नियोजन