BEST 
मुंबई

मुंबईसह महाराष्ट्रात बस सेवांची कमतरता; मुंबईत ८,००० बसेसची आवश्यकता, दर लाख लोकसंख्येमागे केवळ २७ बसेस

मुंबईत सार्वजनिक वाहतुकीसाठी बस सेवांचा तुटवडा आहे. इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सपोर्टेशन अँड डेव्हलपमेंट पॉलिसी (ITDP) च्या अंदाजानुसार, मुंबईला ८,००० बसांची आवश्यकता आहे,

Kamal Mishra

कमल मिश्रा/मुंबई :

मुंबईत सार्वजनिक वाहतुकीसाठी बस सेवांचा तुटवडा आहे. इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सपोर्टेशन अँड डेव्हलपमेंट पॉलिसी (ITDP) च्या अंदाजानुसार, मुंबईला ८,००० बसांची आवश्यकता आहे, मात्र सध्या बेस्ट केवळ ३,००० बस चालवते. यामुळे मुंबईत दर लाख लोकसंख्येमागे केवळ २७ बस उपलब्ध आहेत, जे गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयच्या दर लाख लोकसंख्येमागे ६० बस या मार्गदर्शक तत्त्वांपेक्षा खूपच कमी आहे.

महाराष्ट्रातील शहरी भागांची बस सेवांबाबत दयनीय अवस्था आयटीडीपीच्या अहवालानुसार, महाराष्ट्रातील शहरी भागांमध्येही बस सेवांचा मोठा तुटवडा आहे. राज्यातील ५.६ कोटी रहिवाशांच्या वाहतुकीच्या गरजा भागवण्यासाठी किमान २८,८०० बसांची आवश्यकता आहे. मात्र, सीआयआरटी रिपोर्ट २०२२ नुसार, सध्या राज्यात केवळ ८,७०० बस आहेत, त्यापैकी सुमारे ३,५०० बस त्यांच्या कार्यक्षम कालावधीच्या शेवटी आहेत. यामुळे २४,००० बसांची तातडीची आवश्यकता आहे, ज्यामध्ये जुन्या बसांच्या बदल्याही समाविष्ट आहेत.

शहरी भागांतील बस उपलब्धतेची दुरवस्था

डिसेंबर २०२४ मध्ये आयटीडीपीच्या अभ्यासाने महाराष्ट्रातील शहरी भागांतील सार्वजनिक वाहतूक गरजा तपासल्या. १२व्या पंचवार्षिक योजनेतील शहरी वाहतूक कार्यसमूहाच्या शिफारशींनुसार, दोन लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये सार्वजनिक बस सेवा असावी. मात्र, महाराष्ट्रातील ४४ पैकी केवळ १४ शहरांमध्ये बस सेवा आहे, तर ३० शहरांमध्ये बससेवा उपलब्ध नाही.

बससेवा असलेल्या शहरांमध्येही बसचा तुटवडा

बससेवा असलेल्या १४ शहरांमध्ये दर लाख लोकसंख्येमागे केवळ १५ बस उपलब्ध आहेत, जे दर लाख लोकसंख्येमागे ४०-६० बस या शिफारशींपेक्षा खूपच कमी आहे.

ओबीसी आरक्षणाला धक्का नाही! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही; नोंदी असलेल्यांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळणार

‘देवाभाऊ’ कॅम्पेनवरून जोरदार वादंग; जाहिरात देणारा भाजपच्या मित्रपक्षाचा मंत्री - रोहित पवार

मुंबईला मिळणार वातानुकूलित वंदे मेट्रो; २ हजार ८५६ डब्यांच्या खरेदीची निविदा जाहीर

निवडणूक आयोग भाजपचे कार्यालय बनले का? मल्लिकार्जुन खर्गे यांची टीका

अस्तित्व वाचवण्यासाठी ओमी कलानींची धडपड; अखेर युतीसाठी शिंदे गटाचा दरवाजा ठोठावला