मुंबई

बीडीडी चाळींची गळती दूर होणार; झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन, राज्य सरकार ४९० कोटी रुपये खर्च करणार 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचार संहिता लागू होण्याआधी निविदा प्रक्रिया राबवत तातडीने कामे हाती घ्या, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालक मंत्री दीपक केसरकर यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

Swapnil S

मुंबई  : बीडीडीतील पोलीस वसाहतींची दुरुस्ती, रुग्णालयात पुरेसा औषधसाठा, शासकीय महाविद्यालयांचा विकास शासकीय कार्यालयीन इमारतींची दुरुस्ती, कामगार कल्याण, मत्स्यव्यवसाय, पर्यटन, नागरी वस्त्यांची सुधारणा, झोपडपट्टीवासीयांचे स्थलांतर आणि पुनर्वसन आदी कामे हाती घेण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारने ४९० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचार संहिता लागू होण्याआधी निविदा प्रक्रिया राबवत तातडीने कामे हाती घ्या, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालक मंत्री दीपक केसरकर यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. 

 मुंबई देशाची आर्थिक राजधानी असून जागतिक दर्जाचे शहर म्हणून मुंबईची ओळख. शहरातील नागरिकांच्या हिताची विविध विकासकामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. या कामांसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत प्राप्त झालेला निधी वेळेत खर्च करण्यासाठी तातडीने प्रक्रिया सुरू करून संबंधित सर्व यंत्रणांनी हातात हात घालून काम करावे, असे आवाहन केसरकर यांनी केले. तसेच कार्यालयांत मराठी भाषेत बोलले जावे, अशी सूचना त्यांनी यावेळी केली. शहरातील सर्वात जुन्या इमारतींबाबतचा गेल्या अनेक वर्षांपासूनचा प्रश्न सुटत असल्याने रहिवाशांमध्ये दिलाशाचे वातावरण आहे.

Mumbai Rain : पुढील ४८ तास मुंबईसह उपनगरांसाठी रेड अलर्ट; IMD कडून अतिमुसळधार पावसाचा इशारा

Thane : पाण्यात उतरलेल्या करंटमुळे १७ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू; कुटुंबीयांकडून निष्काळजीपणाचा आरोप

Mumbai : धरण क्षेत्रात पावसाची संततधार; पाणीसाठा ८ टक्के पार, कपातीबाबत पालिकेची ‘थांबा व वाट पाहा’ भूमिका

कर्ज बाजारपेठ दुप्पट; भारतातील बँकांचे कर्ज वितरण पाच वर्षात पोहोचले २५ अब्ज डॉलरवर

Navi Mumbai : ‘त्या’ दोन अधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन; महिलेच्या मृत्यूप्रकरणी आयुक्तांची कारवाई