मुंबई

विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भास्कर जाधव झाले नतमस्तक; नेमकं प्रकरण काय?

ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव हे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर नतमस्तक झाले आणि माघारी फिरले, माध्यमांशी बोलताना सांगितले खरे कारण

प्रतिनिधी

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा आहे. अशामध्ये आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांनी केलेल्या कृत्याची चांगलीच चर्चा झाली. यावेळी ते विधिमंडळाच्या पायऱ्यांवर नतमस्तक झाले आणि हाथ जोडले. त्यानंतर ते माघारी फिरताना, 'आता या सभागृहात येण्याची इच्छा नाही,' असे म्हणत तिथून निघून गेले. त्यांनी केलेल्या या कृतीमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या.

ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव म्हणाले की, "मी आज मी सभागृहातून बाहेर पडलो. उद्या गुढीपाडवा आहे त्यानंतर ३ दिवस सभागृह असणार आहे. पण आता मी गावी निघालो असून पुन्हा येणार नाही. याचे कारण आता या सभागृहात येण्याची इच्छाच राहिलेली नाही. मला जाणीवपूर्वक सभागृहात बोलू दिले जात नव्हते, मला विषयही मांडू दिले जात नव्हते. मी नियमाने बोलण्याचा प्रयत्न करत असूनही हे अधिवेशन, कामकाज चालावे यासाठी मी नियमात राहून लक्षवेधी मांडण्याचा प्रयत्न केला. पण, ती लावली जात नाही आहे. म्हणून मी आता यापुढे सभागृहात येणार नाही," अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

नेपाळमध्ये परिस्थिती चिघळली! PM पाठोपाठ राष्ट्रपतींचाही राजीनामा; आंदोलकांनी परराष्ट्रमंत्री, अर्थमंत्र्यांसह माजी PM ना पळवून पळवून मारले

GenZ Protests : नेपाळमध्ये वातावरण तापले; पंतप्रधान ओलींचा राजीनामा, आंदोलकांसमोर अखेर माघार

करिश्मा कपूरच्या मुलांची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; वडिलांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीमध्ये वाट्याची मागणी

‘लालबागचा राजा’ मंडळावर गुन्हे दाखल करा; अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Stoinis-Sarah Engagement Photos: स्पेनच्या समुद्रकिनारी स्टॉयनिसचा साखरपुडा; फिल्मी स्टाईलमध्ये केलं प्रपोज