संग्रहित छायाचित्र
मुंबई

खासगी कोचिंग क्लासेससाठी लवकरच कायदा आणणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची माहिती

महाविद्यालये आणि खासगी कोचिंग क्लासेस यांच्यातील भ्रष्ट युती मोडून काढण्यासाठी महाराष्ट्र सरकार लवकरच एक कायदा आणणार आहे, असे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी बुधवारी सांगितले.

Swapnil S

मुंबई : महाविद्यालये आणि खासगी कोचिंग क्लासेस यांच्यातील भ्रष्ट युती मोडून काढण्यासाठी महाराष्ट्र सरकार लवकरच एक कायदा आणणार आहे, असे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी बुधवारी सांगितले.

खासगी कोचिंग क्लासेसना मुख्य शैक्षणिक जबाबदाऱ्या न देता, महाविद्यालये आपले काम स्वतंत्रपणे करतील, याची खात्री करून महाविद्यालयांना आपल्या जबाबदारीची जाणीव करून देणारा हा कायदा असेल. खासगी कोचिंग क्लासेसशी समन्वय साधून चालणाऱ्या महाविद्यालयांच्या पद्धतीला आळा घालण्यासाठी सरकार लवकरच एक कायदा आणेल, असेही दादा भुसे म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर त्यांनी विधानसभेत उत्तर दिले.

काहीही न शिकवता शाळा, महाविद्यालयांकडून अतिरिक्त शुल्क वसूल केले जात आहे. मात्र, त्यात पारदर्शकता आणण्यासाठी आणि पालकांचे आर्थिक शोषण रोखण्यासाठी सरकार या नियमांमध्ये सुधारणा करेल, असेही त्यांनी सांगितले.

मुंबईत ४२० अनधिकृत शाळा

मुंबईत ४२० अनधिकृत शाळा आढळल्या असून त्यापैकी ४७ शाळा बंद करण्यात आल्या आहेत, अशी माहितीही भुसे यांनी सभागृहाला दिली. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी विधान परिषदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दादा भुसे म्हणाले की, “मुंबईत अनुदानित तसेच विनाअनुदानित १,०५७ शाळा सुरू आहेत. ४२० अनधिकृत शाळांपैकी १०३ शाळांना दंड ठोठावण्यात आला असून १२६ शाळांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. १,०५७ पैकी २१८ शाळांनी २०२२नंतर परवानगीच्या नूतनीकरणासाठी अर्ज केलेला नाही. २१८ शाळांपैकी २११ शाळांना शिक्षणाच्या अधिकाराखाली परवानगी मंजूर करण्यात आली असून सात शाळा बंद करण्यात आल्या आहेत.”

आता विधानभवनात मंत्री, अधिकाऱ्यांनाच प्रवेश; विधिमंडळात मंत्र्यांना बैठका घेण्यास मनाई, हाणामारीमुळे अभ्यागतांना ‘नो एंट्री’

Ahmedabad Plane Crash : ''माफी मागा, नाहीतर..'' पायलट असोसिएशनची WSJ आणि Reuters ला कायदेशीर नोटीस

विठ्ठलाच्या दर्शनाची आस राहिली अधुरी; चंद्रभागेत तीन महिला भाविक बुडाल्या, दोघींचा मृत्यू, एक बेपत्ता

तृणमूल सरकार गेल्यानंतरच बंगालचा विकास होईल; पंतप्रधानांची गर्जना

आमदार माजलेत, ही जनभावना! मुख्यमंत्र्यांच्या आमदारांना कानपिचक्या