मुंबई

जातीय दंगलीदरम्यान तिघांची हत्या करणारा दोषमुक्त; उच्च न्यायालयाने दिला दिलासा

१९९३ च्या जातीय दंगलीदरम्यान अंधेरीत तिघांची हत्या केल्याचा आरोप असलेल्या किसन सोमा साठे याला उच्च न्यायालयाने मोठा दिलासा देत दोषमुक्त केले.

Swapnil S

मुंबई : १९९३ च्या जातीय दंगलीदरम्यान अंधेरीत तिघांची हत्या केल्याचा आरोप असलेल्या किसन सोमा साठे याला उच्च न्यायालयाने मोठा दिलासा देत दोषमुक्त केले. पाच जणांच्या कबुली जबाबांना समर्थन देण्यासाठी सरकारी पक्ष ठोस पुरावे सादर करण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत न्या. मिलिंद जाधव यांनी साठेला खटल्यातून दोषमुक्त केले.

१२ जानेवारी १९९३ रोजी तलवारी, लोखंडी रॉड आणि काठ्या घेऊन १५ जणांनी अंधेरी एमआयडीसी संकुलातील ब्लू स्टील कंपनीच्या आवारात घुसून ऑन ड्युटी असलेले वॉचमन सोहेब खान, त्यांचा मुलगा नौशाद खानवर हल्ला केला होता. त्यात सोहेबचा जागीच मृत्यू झाला, तर नौशादचा त्याच दिवशी संध्याकाळी मृत्यू झाला. तसेच ब्लू स्टील कंपनीच्या आवारात इरफान अन्सारी या दुसऱ्या व्यक्तीवरही प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्यात त्याचा मृत्यू झाला. अंधेरी एमआयडीसी संकुलातील नोबेल इलेक्ट्रिक कंपनीचे कर्मचारी फिरोज मोहम्मद सुलतान यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी साठेविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. साठे याने या खटल्यातून दोषमुक्त करावे अशी विनंती करणारा अर्ज कनिष्ठ न्यायालयात केला होता. तो अर्ज नोव्हेंबर २०२२ मध्ये न्यायालयाने फेटाळला. त्या विरोधात त्याने उच्च न्यायालयात अपील दाखल केले. त्या अपिलावर न्या. जाधव यांच्या समोर सुनावणी झाली.

IND vs SA: मालिका विजयाची आज संधी; अहमदाबाद येथे भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिकेशी पाचवा टी-२० सामना

बांगलादेश पुन्हा पेटले! शेख हसीनांचा कट्टर विरोधक उस्मान हादीच्या मृत्यूनंतर हिंसाचार; हिंदू तरुणाला ठार केले, मीडिया कार्यालयांना जाळले

Thane: शिंदेंच्या मतदारसंघात भाजपला सेनेसोबत युती नको; भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आक्रमक

शेजाऱ्याने ५ वर्षांच्या चिमुकल्याला 'फुटबॉल'सारखं तुडवलं; धक्कादायक CCTV Video व्हायरल, गुन्हा दाखल

निवृत्तीपूर्वी जज फारच षटकार मारत आहेत! सुप्रीम कोर्टानेच न्यायव्यवस्थेतील भ्रष्ट कारभारावर ओढले ताशेरे