मुंबई

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय आमदार आले एकत्र ; मंत्रालयाला लावलं टाळं...

जोपर्यंत मराठा आरक्षणासंदर्भात ठोस निर्णय सरकार देतं नाही, तोपर्यंत मंत्रालयाच कामकाज चालू न देण्याचा इशारा

नवशक्ती Web Desk

मराठा आरक्षणासाठी आंदोलक आक्रमक झाले आहेत. राज्यात जागोजागी आंदोलन, प्रचार सुरु आहेत. काल नवले पुलावर आंदोलकांनी रस्ता अडवून ठेवला होता. आता आंदोलक आज मुंबईत येऊन पोहचले आहेत. आज मंत्रालयासमोर सर्वपक्षीय आमदारांनी आंदोलन केलं आहे. त्याचबरोबर या आमदारांनी मंत्रालयाला टाळं देखील ठोकलं आहे. जोपर्यंत मराठा आरक्षणासंदर्भात ठोस निर्णय सरकार देतं नाही, तोपर्यंत मंत्रालयाच कामकाज चालू न देण्याचा इशारा या आमदारांनी दिला आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सर्वपक्षीय आमदार मंत्रालयासमोर आंदोलन करत आहेत. यावेळी आमदारांकडून मंत्रालयालाला टाळं लावण्यात आलं आहे. कोणत्याही मंत्र्याला आम्ही मंत्रालयात जाऊ देणार नाही. मराठा आरक्षणासाठी अधिवेशन बोलवा, अशी मागणी सगळे आमदार करत आहेत.

मुंबईतील मंत्रालयाच्या परिसरात सध्या सर्वपक्षीय आमदार आंदोलन करत आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मागणीसाठी त्यांनी हे आंदोलन केलं आहे. या आंदोलनामध्ये राजू नवघरे, अमोल मिटकरी, राहुल पाटील, कैलास पाटील, विक्रम काळे, चेतन तुपे, बाबासाहेब आजबे, यशवंत माने, निलेश लंके, बाळासाहेब पाटील, दिलीप बनकर, बाबाजानी दुर्रानी, मोहन उबर्डे हे आमदार मंत्रालयाच्या समोर आंदोलन करत आहेत.

आरक्षणासंदर्भात ताबोडतोब विशेष आधिवेशन बोलवावं अशी मागणी या आमदारांची आहे, यावेळी आंदोलन करणाऱ्या आमदारांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, 'महिला आरक्षणाकरिता संसदेचे विशेष आधिवेशन बोलवलं होत त्यावर तोडगा देखील निघाला होता , त्याप्रमाणे महाराष्ट्र विधानसभेन एक दिवसाचे अतितात्काळ आधिवेशन बोलवावं, मराठा आंदोलनाच्या संदर्भात ज्या मराठा समाजाच्या भावना आहेत, मागण्या आहेत त्या पुर्ण कराव्यात. यासाठी आम्ही मंत्रालयाला टाळं ठोकलं आहे.'

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

महागड्या शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध; सुप्रिया सुळे यांचे ठाम प्रतिपादन

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

डोममध्ये रंगला झिम्मा; शर्मिला ठाकरे, सुषमा अंधारे यांची फुगडी

देशात गरीबांची संख्या वाढणे ही चिंता वाढवणारी बाब; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन