अर्धवट बांधकामातील पाण्यात बुडून बालकाचा मृत्यू 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Mira-Bhayandar : अर्धवट बांधकामातील पाण्यात बुडून बालकाचा मृत्यू

मीरारोड रेल्वे स्थानकाबाहेरील अर्धवट अवस्थेत असलेल्या शॉपिंग मॉलच्या बांधकामस्थळी साचलेल्या पाण्यात बुडून ८ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री उघडकीस आली. बिलाल वसीम सलमानी असे मृत मुलाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप आणि शोक व्यक्त केला जात आहे.

Swapnil S

भाईंंदर : मीरारोड रेल्वे स्थानकाबाहेरील अर्धवट अवस्थेत असलेल्या शॉपिंग मॉलच्या बांधकामस्थळी साचलेल्या पाण्यात बुडून ८ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री उघडकीस आली. बिलाल वसीम सलमानी असे मृत मुलाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप आणि शोक व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मीरारोड (पूर्व) स्थानकाबाहेर गेल्या अनेक वर्षांपासून एका शॉपिंग मॉलचे बांधकाम रखडलेले आहे. या ठिकाणी मोठा खड्डा खोदण्यात आला असून त्यात पावसाचे व सांडपाणी साचलेले होते. परिसरातील तिसरीत शिकणारा बिलाल सलमानी शनिवारी दुपारी खेळण्यासाठी घराबाहेर गेला होता.

बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. मात्र, रात्री उशिरापर्यंत तो सापडला नाही. अखेर रात्रीच्या सुमारास नातेवाईकांनी संबंधित बांधकामस्थळी शोध घेतला असता पाण्याच्या खड्ड्याबाहेर बिलालचे कपडे आढळून आले. त्यानंतर पाण्यात शोध घेतल्यावर त्याचा मृतदेह सापडला. घटनेची माहिती मिळताच नयानगर पोलीस ठाणे पथकाने घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांनी सध्या अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे.

एका निष्पाप मुलाचा बळी गेल्याने अर्धवट राहिलेल्या बांधकामांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

कोलकात्यात बांधकामाधीन गोदामाचे छत कोसळले; ३ ठार, अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, Video

Mumbai : महापौरांसमोरच मॅनहोलमध्ये पडला सफाई कर्मचारी; अधिकाऱ्यांना निलंबनाचा इशारा, Video

'सत्य सांगणं इतकं कठीण झालंय का?' केतन अग्रवाल प्रकरणावर हिना खानची प्रतिक्रिया; म्हणाली, "त्याचा जीव वाचला असता...

प्रियकरासोबत पळून गेल्यास कुटुंबाची बदनामी झाली असती; मग होणाऱ्या नवऱ्यालाच दरीत ढकललं, केतन अग्रवाल प्रकरणात नवी माहिती

Mumbai : मुसळधार पावसात धावत्या लोकलमध्ये क्षुल्लक वाद विकोपाला; २२ वर्षीय तरुणाची चाकू भोसकून हत्या, आरोपी फरार