अर्धवट बांधकामातील पाण्यात बुडून बालकाचा मृत्यू 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Mira-Bhayandar : अर्धवट बांधकामातील पाण्यात बुडून बालकाचा मृत्यू

मीरारोड रेल्वे स्थानकाबाहेरील अर्धवट अवस्थेत असलेल्या शॉपिंग मॉलच्या बांधकामस्थळी साचलेल्या पाण्यात बुडून ८ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री उघडकीस आली. बिलाल वसीम सलमानी असे मृत मुलाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप आणि शोक व्यक्त केला जात आहे.

Swapnil S

भाईंंदर : मीरारोड रेल्वे स्थानकाबाहेरील अर्धवट अवस्थेत असलेल्या शॉपिंग मॉलच्या बांधकामस्थळी साचलेल्या पाण्यात बुडून ८ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री उघडकीस आली. बिलाल वसीम सलमानी असे मृत मुलाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप आणि शोक व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मीरारोड (पूर्व) स्थानकाबाहेर गेल्या अनेक वर्षांपासून एका शॉपिंग मॉलचे बांधकाम रखडलेले आहे. या ठिकाणी मोठा खड्डा खोदण्यात आला असून त्यात पावसाचे व सांडपाणी साचलेले होते. परिसरातील तिसरीत शिकणारा बिलाल सलमानी शनिवारी दुपारी खेळण्यासाठी घराबाहेर गेला होता.

बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. मात्र, रात्री उशिरापर्यंत तो सापडला नाही. अखेर रात्रीच्या सुमारास नातेवाईकांनी संबंधित बांधकामस्थळी शोध घेतला असता पाण्याच्या खड्ड्याबाहेर बिलालचे कपडे आढळून आले. त्यानंतर पाण्यात शोध घेतल्यावर त्याचा मृतदेह सापडला. घटनेची माहिती मिळताच नयानगर पोलीस ठाणे पथकाने घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांनी सध्या अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे.

एका निष्पाप मुलाचा बळी गेल्याने अर्धवट राहिलेल्या बांधकामांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

पेन्शन क्षेत्रात १००% एफडीआय; संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विधेयक मांडले जाण्याची शक्यता

बचत गटाच्या महिलांना जीएसटीचे प्रशिक्षण; GST बिल मिळवणे होणार एकदम सुलभ; BMC च्या एफ-दक्षिण विभागाचा उपक्रम

अनधिकृत प्रवासी वाहतुकीवर कारवाई सुरू; वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभाग सक्रिय

म्हाडाच्या महागड्या घरांच्या किमती कमी होणार? घरांना अल्प प्रतिसाद मिळाल्याने फेरविचाराची शक्यता

गोव्याची साध्वी सतीश साईल ठरली 'मिस इंडिया वर्ल्ड २०२६'; आता 'मिस वर्ल्ड'साठी करणार भारताचे प्रतिनिधित्व