अर्धवट बांधकामातील पाण्यात बुडून बालकाचा मृत्यू 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Mira-Bhayandar : अर्धवट बांधकामातील पाण्यात बुडून बालकाचा मृत्यू

मीरारोड रेल्वे स्थानकाबाहेरील अर्धवट अवस्थेत असलेल्या शॉपिंग मॉलच्या बांधकामस्थळी साचलेल्या पाण्यात बुडून ८ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री उघडकीस आली. बिलाल वसीम सलमानी असे मृत मुलाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप आणि शोक व्यक्त केला जात आहे.

Swapnil S

भाईंंदर : मीरारोड रेल्वे स्थानकाबाहेरील अर्धवट अवस्थेत असलेल्या शॉपिंग मॉलच्या बांधकामस्थळी साचलेल्या पाण्यात बुडून ८ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री उघडकीस आली. बिलाल वसीम सलमानी असे मृत मुलाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप आणि शोक व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मीरारोड (पूर्व) स्थानकाबाहेर गेल्या अनेक वर्षांपासून एका शॉपिंग मॉलचे बांधकाम रखडलेले आहे. या ठिकाणी मोठा खड्डा खोदण्यात आला असून त्यात पावसाचे व सांडपाणी साचलेले होते. परिसरातील तिसरीत शिकणारा बिलाल सलमानी शनिवारी दुपारी खेळण्यासाठी घराबाहेर गेला होता.

बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. मात्र, रात्री उशिरापर्यंत तो सापडला नाही. अखेर रात्रीच्या सुमारास नातेवाईकांनी संबंधित बांधकामस्थळी शोध घेतला असता पाण्याच्या खड्ड्याबाहेर बिलालचे कपडे आढळून आले. त्यानंतर पाण्यात शोध घेतल्यावर त्याचा मृतदेह सापडला. घटनेची माहिती मिळताच नयानगर पोलीस ठाणे पथकाने घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांनी सध्या अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे.

एका निष्पाप मुलाचा बळी गेल्याने अर्धवट राहिलेल्या बांधकामांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Mumbai : कुर्ल्यात पहाटे मोठी दुर्घटना! क्रेनचा भाग झोपड्यांवर कोसळला; ३ महिन्यांच्या बाळासह १० जण जखमी, VIDEO

Mumbai : रेल्वे स्थानकावरील एस्केलेटर दोन मिनिटांत सुरू होणार; पश्चिम रेल्वेच्या नवीन व्यवस्थेमुळे खंडित वेळ होणार कमी

७०२ कोटींचा प्रस्ताव मंजूर; सायन्स सेंटर मेट्रो स्थानक ते वरळी प्रॉमेनेड जोडणाऱ्या पादचारी पुलाचा मार्ग मोकळा

Navi Mumbai : उरणला साथीच्या आजारांचा विळखा; रुग्णालयांत रुग्णांची गर्दी

ST सहकारी बँकेत ३४ कोटींचा गैरव्यवहार? खरेदी व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी