मुंबई

५० ते ६० जणांकडून घेतलेल्या साडेसहा कोटींचा अपहार

कंपनीत ३६ लाख ५५ हजार रुपयांची गुंतवणूक केली होती

नवशक्ती Web Desk

मुंबई : कंपनीच्या विविध योजनेत गुंतवणूक केल्यास तिप्पट रक्कमेचे गाजर दाखवून ६० हून अधिक गुंतवणुकदारांची सुमारे साडेसहा कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कंपनीच्या संचालकाविरुद्ध साकिनाका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यात रितेश पांचाळ, संदीप मांजरेकर, सुनिल मुळे यांच्यासह श्री महाकाली ग्रुप ऑफ कंपनी, श्री महाकाली सहकारी क्रेडिट सोसायटीचे इतर संचालकाचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. ५१ वर्षांची तक्रारदार महिला साकिनाका येथे राहत असून, ती पहिली ते दहावीपर्यंतच्या मुलांसाठी खाजगी कोचिंग क्लासेस घेते. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यांत ती तिच्या माहेरी गेली होती. यावेळी तिच्या वडिलांच्या घरी श्री महाकाली कंपनीचे सेवाराम जैस्वानी आणि मोहन पाटील हे दोन कर्मचारी त्यांच्या कंपनीची विविध योजनांची माहिती देण्यासाठी आले होते. या दोघांनी पवई येथील रितेश पांचाळ यांच्या मालकीचे तेरा कंपन्या असून, या कंपनीने त्यांच्या गुंतवणुकदारासाठी विविध आकर्षक व्याजदराच्या योजना सुरू केल्या आहेत. या योजनेत गुंतवणूक केल्यास त्यांना दहा ते वीस टक्के महिन्याला तिप्पट परतावा मिळेल. त्यामुळे या महिलेने तिच्या बहिणीसह वडिलांसोबत कंपनीच्या ठाणे, पवईतील कार्यालयात भेट दिली होती. तिथेच त्यांची रितेश पांचाळ, संदीप मांजरेकर, सुनिल मुळेसह इतर संचालकाची भेट झाली होती. या भेटीनंतर त्यांनी कंपनीत ३६ लाख ५५ हजार रुपयांची गुंतवणूक केली होती.

Maharashtra HSC Exam 2025 : पूरग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा; बारावीचा अर्ज भरण्यास मुदतवाढ

लॉरेन्स बिश्नोई गँग दहशतवादी संघटना म्हणून घोषित; कॅनडा सरकारचा मोठा निर्णय, टोळीसोबत व्यवहार केल्यास होणार शिक्षा

एका रात्रीत ३७ गायी, २० शेळ्यांचा बळी! पुरामुळे दुग्धव्यवसाय उद्ध्वस्त; धाराशिवच्या शेतकऱ्याचे ६० लाखांचे नुकसान, मदत अपुरी

वैष्णवी हगवणे प्रकरण : सासू-नणंदेचा पुणे न्यायालयाने फेटाळला जामीन; म्हणाले, "नऊ महिन्यांच्या बाळाची आई...

महाराष्ट्रात पावसाचे संकट; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची विशेष अधिवेशनाची मागणी