१२५ लाख टन भार पेलण्याची क्षमता; पुलाचे आयुर्मान १०० वर्षांचे  
मुंबई

Missing Link Project : १२५ लाख टन भार पेलण्याची क्षमता; पुलाचे आयुर्मान १०० वर्षांचे

‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे उद‌्घाटन १ मे रोजी होणार आहे. या प्रकल्पात पश्चिम घाटातील दोन डोंगरामध्ये केबल स्टेड पूल उभारणीचे आव्हान मोठे होते.

Swapnil S

मुंबई : ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे उद‌्घाटन १ मे रोजी होणार आहे. या प्रकल्पात पश्चिम घाटातील दोन डोंगरामध्ये केबल स्टेड पूल उभारणीचे आव्हान मोठे होते. गुंतागुंतीचे अभियांत्रिकी, दळणवळणाच्या अडचणी, आणि जागतिक सहकार्याने जवळपास सहा वर्षांनंतर हा पूल पूर्ण झाला आहे.

या पूलाच्या उभारणीबाबत ॲफकॉन्सचे प्रकल्प संचालक रंजन कुमार मिश्रा यांच्याशी ‘एफपीजे-नवशक्ति’च्या विशेष प्रतिनिधी स्वीटी भागवत यांच्याशी केलेली बातचीत.

ॲॅकफॉन्सचे प्रकल्प संचालक मिश्रा म्हणाले की, हा पूल पश्चिम घाटातील दोन टेकड्यांमध्ये उभा आहे. ज्यामुळे बांधकामादरम्यान जागेवर पोहोचणे ही मोठी अडचण होती. हा पूल ताशी १०० किमी वेगाने जाणाऱ्या वाहनासाठी बनवला असून त्याचे आयुर्मान १०० वर्षांचे आहे, असे ते म्हणाले.

मिश्रा म्हणाले की, या मार्गाच्या रचनेमुळे हे एक गुंतागुंतीचे काम होते. उपकरणे, साहित्य आणि मनुष्यबळ पोहोचवण्यासाठी अतिरिक्त प्रवेश मार्ग विकसित करावा लागला.आम्हाला संपूर्ण पायाभूत सुविधा शून्यातून उभाराव्या लागल्या. यंत्रसामग्रीची वाहतूक करणे, कामगारांच्या निवासस्थानांची उभारणी करावी लागली, असे त्यांनी सांगितले.

रणगाडे, ट्रेलरसाठी सक्षम

‘आयआरसी क्लास ७०आर’ लोडिंगनुसार या पुलाची रचना सर्वोच्च भार मानकांनुसार करण्यात आली आहे. हा केवळ नियमित वाहतुकीसाठी असलेला पारंपरिक पूल नाही. तो लष्करी रणगाडे आणि विशेष औद्योगिक ट्रेलरसह अत्यंत जड भार हाताळू शकतो.

Jharkhand Student Protest : भरती परीक्षांविरोधातील आंदोलन तीव्र; पोलिसांना धक्काबुक्की, ABVP चे ११० कार्यकर्ते ताब्यात

Mumbai-Pune Expressway : 'मिसिंग लिंक' उद्या ३ तास बंद; प्रवासाला निघण्यापूर्वी वाचा महत्त्वाची बातमी

IPL क्रिकेटपटू अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचाराचा आरोप

Government Holiday : मुंबईकरांना दहीहंडीऐवजी रक्षाबंधनला सुट्टी; ऑगस्टअखेरीस मिळणार सलग ३ दिवसांचा ब्रेक

Mumbai : 'लोकलमधील ३ डबे विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवा'; Gen Z, Gen Alpha साठी तेजस्वी घोसाळकरांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी