मुंबई

दमदार पावसामुळे मोडक सागर ओव्हरफ्लो

मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतक्या पाण्याची गरज भासते

प्रतिनिधी

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत गेल्या १८ दिवसांत पावसाची दमदार इनिंग सुरू आहे. त्यामुळे १२ जुलै रोजी सातही धरणात ७,२८,२८६ दशलक्ष लिटर पाणी म्हणजेच ५० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. तसेच मोडक सागर ओव्हरफ्लो झाला आहे.

अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार व तुळशी या सात तलावांमधून दररोज ३,८५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा होतो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतक्या पाण्याची गरज भासते.

धरणात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे लवकरच सातही धरणात वर्षभराचा पाणीसाठा उपलब्ध होईल, असा विश्वास पालिकेच्या जल विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. सध्या सात तलावांत एकूण ७,२८,२८६ दशलक्ष लिटर इतका म्हणजे मुंबईसाठी वर्षभरासाठी आवश्यक १४,४७,३६३ दशलक्ष लिटर इतक्या पाणीसाठ्याच्या ५० टक्क्यांपेक्षाही जास्त पाणीसाठा जमा झाला आहे. हा पाणीसाठा मुंबईकरांना १६ जानेवारी २०२३पर्यंत पुरेल इतका आहे.

महाराष्ट्रात ९,०७२ कोटींच्या रेल्वे प्रकल्पाला मंजुरी; २३१ किलोमीटरचा नवीन रेल्वे मार्ग मंजूर

VSR वर कारवाई; अजित पवारांच्या विमान अपघातानंतर DGCA ॲक्शन मोडमध्ये; चार विमानांच्या उड्डाणावर बंदी

अपघातग्रस्त विमानाचा ३००० तासांचा रेकॉर्डच उपलब्ध नाही! रोहित पवारांच्या X वरील दाव्याने खळबळ; चौकशी लांबवली जात असल्याची शंका

दोन वर्षांत १.१७ लाख महिला बेपत्ता; ३१ हजार महिला अद्याप सापडल्या नाहीत

नागपूर महापालिकेत 'महिला राज'; महापौर, उपमहापौर, स्थायी समितीसह सर्व १४ विषय समित्यांच्या सभापतीपदी महिला