मुंबई

दमदार पावसामुळे मोडक सागर ओव्हरफ्लो

मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतक्या पाण्याची गरज भासते

प्रतिनिधी

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत गेल्या १८ दिवसांत पावसाची दमदार इनिंग सुरू आहे. त्यामुळे १२ जुलै रोजी सातही धरणात ७,२८,२८६ दशलक्ष लिटर पाणी म्हणजेच ५० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. तसेच मोडक सागर ओव्हरफ्लो झाला आहे.

अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार व तुळशी या सात तलावांमधून दररोज ३,८५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा होतो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतक्या पाण्याची गरज भासते.

धरणात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे लवकरच सातही धरणात वर्षभराचा पाणीसाठा उपलब्ध होईल, असा विश्वास पालिकेच्या जल विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. सध्या सात तलावांत एकूण ७,२८,२८६ दशलक्ष लिटर इतका म्हणजे मुंबईसाठी वर्षभरासाठी आवश्यक १४,४७,३६३ दशलक्ष लिटर इतक्या पाणीसाठ्याच्या ५० टक्क्यांपेक्षाही जास्त पाणीसाठा जमा झाला आहे. हा पाणीसाठा मुंबईकरांना १६ जानेवारी २०२३पर्यंत पुरेल इतका आहे.

मेट्रो-५च्या टेंडर, अलाइनमेंटला सुरुवात; उल्हासनगरच्या विकासाला मिळणार नवी दिशा

Mumbai : पुन्हा BEST चा अपघात! पवईत इलेक्ट्रिक बस दुभाजकावर आदळली; ७ प्रवासी जखमी, चालक म्हणाला- 'कारकडे लक्ष गेलं'

Palghar Rain Alert : पालघरला मुसळधार पावसाचा तडाखा! डहाणू-तलासरीत पूरस्थिती, रेल्वे सेवा ठप्प

Lonavala Viral Video : ट्रेकिंगदरम्यान थोडक्यात बचावला तरुण; पावसाळ्यात सुरक्षित ट्रेकसाठी घ्या 'ही' खबरदारी

Mumbai : "ड्रग्ज प्रकरणात अडकवून आयुष्य उद्ध्वस्त करेन"; आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना पोलिसाची धमकी, VIDEO व्हायरल