संग्रहित छायाचित्र पीटीआय
मुंबई

मोदींनी दहशतवाद, नक्षलवाद कायमचा संपवला - शहा

Maharashtra assembly elections 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातून दहशतवाद, नक्षलवाद कायमचा संपुष्टात आणला असून, जम्मू-काश्मीरला देण्यात आलेला विशेष दर्जा ‘कलम ३७०’ हटवण्यात आल्याने संपुष्टात आला असून तो पुन्हा लागू करता येणार नाही, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर केले.

Swapnil S

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातून दहशतवाद, नक्षलवाद कायमचा संपुष्टात आणला असून, जम्मू-काश्मीरला देण्यात आलेला विशेष दर्जा ‘कलम ३७०’ हटवण्यात आल्याने संपुष्टात आला असून तो पुन्हा लागू करता येणार नाही, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर केले.

मुंबईत घाटकोपर, बोरिवली येथे झालेल्या महायुतीच्या प्रचारसभेत शहा बोलत होते. ‘विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. यादिवशी महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार सत्तेत येणार, असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला. आघाडीचा सुपडा साफ होणार, असा दावाही अमित शहा यांनी केला. काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी संविधान संपवणार, अशी ओरड करत आहेत. पण संविधान कोणी संपवू शकत नाही. राहुल गांधी यांनी जनतेशी धोका करीत देशातील जनतेचा अपमान केला आहे, अशी टीका त्यांनी केली.

महाराष्ट्रात महायुतीचे सरकार सत्तेत येत असून नरेंद्र मोदी यांचे हात मजबूत करायचे आहेत. त्यामुळे विजयाच्या संकल्पाची मूठ घट्ट करा आणि उतर मुंबईतील सहाही उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन त्यांनी उत्तर मुंबईतील मतदारांना केले.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक