मुंबई

मोटरमेनचे आंदोलन मागे; डीआरएमसोबत झालेल्या बैठकीनंतर निर्णय

मोटरमन मुरलीधर शर्मा यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे मोटरमेनमध्ये संतापाची लाट पसरली होती.

Swapnil S

कमल मिश्रा/मुंबई : विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनीश गोयल यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर मोटरमेननी ‘नियमानुसार काम’ आंदोलन मागे घेतले आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मोटरमन मुरलीधर शर्मा यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे मोटरमेनमध्ये संतापाची लाट पसरली होती. परिणामी मोटरमेननी अतिरिक्त कामास नकार देऊन ‘नियमा’नुसार काम सुरू केले. त्यामुळे मुंबईची लोकल विलंबाने धावू लागली. रेल्वेचे डीआरएम रजनीश गोयल व मोटरमन यांच्यात रविवारी तातडीची बैठक झाली. यात सीआरएमएसचे विभागीय अध्यक्ष विवेक शिशोदिया व मोटरमन सहभागी झाले होते. सिग्नल तोडल्यानंतर मोटरमनला सक्तीची निवृत्ती देण्याचा निर्णय स्वीकारार्ह नाही, अशी भूमिका कामगार संघटनांनी घेतली. शिशोदिया यांनी मोटरमनची बाजू डीआरएमसमोर मांडली. या बैठकीत डीआरएम रजनीश गोयल यांनी मोटरमनच्या समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले. कामगार नेते विवेक शिशोदिया म्हणाले की, सिग्नल तोडल्यानंतर होणाऱ्या शिक्षेबाबतच्या नियमात बदल करण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डासमोर रेल्वेच्या मुंबई विभागाकडून मांडला जाईल, असे आश्वासन डीआरएम रजनीश गोयल यांनी दिले. रेल्वे बोर्डाकडून याबाबतचा अंतिम निर्णय येईपर्यंत मोटरमनना नोकरी हमी मिळू शकेल. सिग्नल तोडल्यानंतर त्यांना तत्काळ कामावरून काढले जाणार नाही. या ठरावामुळे मोटरमन आणि प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. सोमवारपासून उपनगरीय गाड्यांचे नेहमीप्रमाणे सुरू राहतील.

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

महागड्या शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध; सुप्रिया सुळे यांचे ठाम प्रतिपादन

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

डोममध्ये रंगला झिम्मा; शर्मिला ठाकरे, सुषमा अंधारे यांची फुगडी

देशात गरीबांची संख्या वाढणे ही चिंता वाढवणारी बाब; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन