मुंबई

मुंबईतील सागरीकिनाऱ्यांचे वैभव पुन्हा परतणार; जिओ क्यूब तंत्रज्ञानाचा वापर करण्याची योजना, पालक मंत्री दीपक केसरकर यांचे सुतोवाच

मुंबईतील दादर, माहीम आदी समुद्रकिनाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर धूप झाल्याने तेथे जिओ क्यूब तंत्राचा वापर करून हे किनारे पूर्ववत केले जाणार आहेत.

Swapnil S

मुंबई : मुंबईतील दादर, माहीम आदी समुद्रकिनाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर धूप झाल्याने तेथे जिओ क्यूब तंत्राचा वापर करून हे किनारे पूर्ववत केले जाणार आहेत.

मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पालिका मुख्यालयात पत्रकारांना सांगितले, की मुंबईतील दादर, माहीमसारख्या प्रमुख चौपाट्या आता केवळ २० ते २५ फूट इतक्या शिल्लक राहिल्या आहेत. त्या पूर्ववत करण्याचे काम केले जाणार आहे. वर्षभरात हे किनारे पूर्ववत केले जातील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले की, ज्या ज्या ठिकाणी समुद्रकिनाऱ्यांची धूप झाली आहे त्या जागेत जिओ क्यूब टाकले जातील. हे जिओ क्यूब पर्यावरणस्नेही आहेत. त्यामुळे येथे कोणतीही समस्या उद्भवणार नाही. त्याचबरोबर दादरसारख्या किनाऱ्यांना पुन्हा त्यांचे वैभव प्राप्त होईल. याच धर्तीवर प्रभादेवी ते माहीम हा किनारा पूर्ववत संवर्धित करण्याचा आमचा विचार आहे.

हवा प्रदूषण कमी करण्याचा लखनऊ पॅटर्न

केसरकर यांनी सांगितले की, मुंबईत हवा प्रदूषणाची समस्या वाढते आहे. त्याला आळा घालण्यासाठी आम्ही लखनऊ पॅटर्नचा वापर करणार आहोत. या योजनेत धुली कण हे हवेतच एकत्र करून ते जमिनीवर खाली पाडण्याचे तंत्र वापरले जाते. या तंत्राचे सादरीकरण आम्ही पालिका आयुक्तांपुढे करणार आहोत. त्यानंतर मुंबईच्या काही भागात त्याची चाचणी केली जाईल. ते यशस्वी ठरल्यास संपूर्ण शहरात हवा स्वच्छ करण्यासाठी त्याचा वापर केला जाईल.

शिमग्याला गावी जाणाऱ्या कोकणकरांसाठी गुड न्यूज! मुंबई-विजयदुर्ग रो-रो फेरी १ मार्चपासून; पाहा वेळापत्रक आणि तिकीट दर

नागपुरात १२ वीचा केमिस्ट्री पेपर लीक! विद्यार्थिनीच्या वारंवार वॉशरूमला जाण्यामुळे आली शंका; मोबाईलमध्ये सापडला पुरावा

आता शिळफाटा रस्त्यावर मेट्रोने प्रवास; मेट्रो १२ च्या विस्तारीकरणाची घोषणा; MMRDA च्या अर्थसंकल्पात समावेश

Mumbai : मोनोरेल पुन्हा धावणार! सीसीटीव्ही, चार्जिंग पॉइंट्स, स्मार्ट सिग्नलिंग अशा २१ नव्या सुविधांसह सज्ज; MMRDA ची घोषणा

महामार्गावर टोलवसुली होणार कॅशलेस; १ एप्रिलपासून अंमलबजावणीचे संकेत