Mumbai : नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळलेच पाहिजेत; हायकोर्टाचे महत्त्वपूर्ण मत 
मुंबई

Mumbai : नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळलेच पाहिजेत; हायकोर्टाचे महत्त्वपूर्ण मत

नागरिकांनी वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळलेच पाहिजेत. भारतीय नागरिक परदेशात नियम पाळतात, मग मायदेशात नियम धाब्यावर का बसवतात, असे महत्त्वपूर्ण मत उच्च न्यायालयाने एका प्रकरणात व्यक्त केले.

Swapnil S

मुंबई : नागरिकांनी वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळलेच पाहिजेत. भारतीय नागरिक परदेशात नियम पाळतात, मग मायदेशात नियम धाब्यावर का बसवतात, असे महत्त्वपूर्ण मत उच्च न्यायालयाने एका प्रकरणात व्यक्त केले. टीएमटी बसच्या धडकेत मृत्यू झालेल्या पादचाऱ्याच्या कुटुंबीयांना वाढीव नुकसानभरपाई मंजूर करताना न्यायालयाने वाहतूक नियमांबाबत महत्वपूर्ण भाष्य केले.

९ नोव्हेंबर २०१२ रोजी ठाण्यातील आराधना टॉकीजजवळ रस्ता ओलांडताना सतीश जोशी यांना टीएमटी बसने धडक दिली होती. अपघातात गंभीर जखमी झालेल्या जोशी यांचा १६ मार्च २०१३ रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने जोशी यांच्या कुटुंबीयांना १३.२३ लाख रुपये नुकसानभरपाई मंजूर केली होती. भरपाईची रक्कम अपुरी असल्याचा दावा करत जोशी यांच्या पत्नी आणि मुलीने उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या एकलपीठाने निर्णय दिला.

"व्हिडीओ पाहायला आमच्याकडे वेळ नाही"; CJP आंदोलकांच्या याचिकेवर सरन्यायाधीश सूर्य कांत यांचे भाष्य, तातडीच्या सुनावणीस नकार

आता AI ठेवणार पक्ष्यांवर नजर! महाराष्ट्रात उभारलं जाणार देशातील पहिलं AI-आधारित पक्षी अभयारण्य

Mumbai Rains : पावसात अडकलेल्या मुंबईकरांना 'Vi'चा दिलासा! स्टोअरमध्ये घेता येणार आश्रय, मोबाईल चार्जिंगचीही सोय

१८ वर्षीय तरुणाने घातला ६५ कोटींचा गंडा! AI च्या मदतीने बनवले १२१ बनावट अ‍ॅप्स

Mumbai Rain Alert : मुंबईत मुसळधार पावसासह भरतीचाही धोका; वादळी वाऱ्याचा इशारा, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन