Mumbai : नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळलेच पाहिजेत; हायकोर्टाचे महत्त्वपूर्ण मत 
मुंबई

Mumbai : नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळलेच पाहिजेत; हायकोर्टाचे महत्त्वपूर्ण मत

नागरिकांनी वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळलेच पाहिजेत. भारतीय नागरिक परदेशात नियम पाळतात, मग मायदेशात नियम धाब्यावर का बसवतात, असे महत्त्वपूर्ण मत उच्च न्यायालयाने एका प्रकरणात व्यक्त केले.

Swapnil S

मुंबई : नागरिकांनी वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळलेच पाहिजेत. भारतीय नागरिक परदेशात नियम पाळतात, मग मायदेशात नियम धाब्यावर का बसवतात, असे महत्त्वपूर्ण मत उच्च न्यायालयाने एका प्रकरणात व्यक्त केले. टीएमटी बसच्या धडकेत मृत्यू झालेल्या पादचाऱ्याच्या कुटुंबीयांना वाढीव नुकसानभरपाई मंजूर करताना न्यायालयाने वाहतूक नियमांबाबत महत्वपूर्ण भाष्य केले.

९ नोव्हेंबर २०१२ रोजी ठाण्यातील आराधना टॉकीजजवळ रस्ता ओलांडताना सतीश जोशी यांना टीएमटी बसने धडक दिली होती. अपघातात गंभीर जखमी झालेल्या जोशी यांचा १६ मार्च २०१३ रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने जोशी यांच्या कुटुंबीयांना १३.२३ लाख रुपये नुकसानभरपाई मंजूर केली होती. भरपाईची रक्कम अपुरी असल्याचा दावा करत जोशी यांच्या पत्नी आणि मुलीने उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या एकलपीठाने निर्णय दिला.

मेट्रो-३ साठी आता सवलतीच्या दरात पास; बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सवलत, प्रवास खर्च २५ टक्क्यांनी कमी

आगामी जनगणना प्रक्रियेच्या अनुषंगाने व्यापक तयारी सुरू; ठाणेकरांनो ३३ प्रश्नांची उत्तरे तयार ठेवा

कोकणसाठी ४ वातानुकूलित विशेष रेल्वेगाड्या; CSMT आणि मडगाव स्थानकांदरम्यान धावणार

‘स्वातंत्र्यवीर’ ही पदवी सरकारने बहाल केलेली नाही; सात्यकी सावरकर यांची न्यायालयात कबुली

आपत्ती व्यवस्थापनात तुकाराम मुंढेंना ‘नो एंट्री’; पुन्हा विनिता वैद सिंघल यांची वर्णी