Mumbai : नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळलेच पाहिजेत; हायकोर्टाचे महत्त्वपूर्ण मत 
मुंबई

Mumbai : नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळलेच पाहिजेत; हायकोर्टाचे महत्त्वपूर्ण मत

नागरिकांनी वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळलेच पाहिजेत. भारतीय नागरिक परदेशात नियम पाळतात, मग मायदेशात नियम धाब्यावर का बसवतात, असे महत्त्वपूर्ण मत उच्च न्यायालयाने एका प्रकरणात व्यक्त केले.

Swapnil S

मुंबई : नागरिकांनी वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळलेच पाहिजेत. भारतीय नागरिक परदेशात नियम पाळतात, मग मायदेशात नियम धाब्यावर का बसवतात, असे महत्त्वपूर्ण मत उच्च न्यायालयाने एका प्रकरणात व्यक्त केले. टीएमटी बसच्या धडकेत मृत्यू झालेल्या पादचाऱ्याच्या कुटुंबीयांना वाढीव नुकसानभरपाई मंजूर करताना न्यायालयाने वाहतूक नियमांबाबत महत्वपूर्ण भाष्य केले.

९ नोव्हेंबर २०१२ रोजी ठाण्यातील आराधना टॉकीजजवळ रस्ता ओलांडताना सतीश जोशी यांना टीएमटी बसने धडक दिली होती. अपघातात गंभीर जखमी झालेल्या जोशी यांचा १६ मार्च २०१३ रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने जोशी यांच्या कुटुंबीयांना १३.२३ लाख रुपये नुकसानभरपाई मंजूर केली होती. भरपाईची रक्कम अपुरी असल्याचा दावा करत जोशी यांच्या पत्नी आणि मुलीने उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या एकलपीठाने निर्णय दिला.

कमी पाण्याची पिके घ्या; शेती खात्याचे शेतकऱ्यांना आवाहन

आसाममधील चहाच्या मळ्याचा ‘टी टुरिझम’वर भर; ग्राहकांना चहाच्या संस्कृतीशी पुन्हा जोडण्याचा प्रयत्न

‘गृह’ अन् ‘महसूल’ खाते कोणाकडे हे माहिती आहे का? परिवहन मंत्री सरनाईक यांचा आमदार मेहतांना टोला

मुंबईत गंभीर गुन्हेगारीत वाढ; गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा खुनाच्या गुन्ह्यांमध्येही मोठी वाढ

Navi Mumbai : एनआरआय फ्लेमिंगो तलावावर पर्यटकांची झुंबड; DPS, TSC वेटलँड्स पुनर्जीवित करा, पर्यावरणवाद्यांची राज्य सरकारकडे मागणी