मुंबई

कांदिवलीतील निवासी इमरातील भीषण आग ; पाच जण जखमी

आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास मुंबईतील कांदिवली पश्चिम भागातील महावीर नगर येथील पवनधाम वीणा संतूर इमरातीला भीषण आग लागल्याची घटना घडली.

नवशक्ती Web Desk

मुंबई : मुंबईत इमरातींचा आग लागण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास मुंबईतील कांदिवली पश्चिम भागातील महावीर नगर येथील पवनधाम वीणा संतूर इमरातीला भीषण आग लागल्याची घटना घडली. ही आग लेवल-१ ची असल्याची माहिती बीएमसीने दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या घटनेत पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

प्राप्त माहितीनुसारस ही आग ८ मजली इमरतीच्या पहिल्या मजल्यावरील इलेक्ट्रिक वायरिंग आणि इंस्टॉलेशन्सपर्यंत मर्यादित आहे. आग लागल्याची माहिती मिळताच बीएमसी, एमएफबी आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

अग्निशमन दल्याच्या प्रयत्नांनी पवनधाम वीणा संतूर इमरातीला लागलेली आग अखेर आटोक्यात आली आहे. त्याच बरोबर इमरातीला विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. अग्निशमन दलाने कुलिंग ऑपरेशन सुरु केलं आहे.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत