मुंबई

Mumbai : गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याचा खर्च महागला; सुधारित बोगदा रचनेमुळे एक हजार कोटींनी वाढ

पूर्व व पश्चिम उपनगरांना जोडणारा जीएमएलआर हा महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून तो मुंबईतील चौथा पूर्व–पश्चिम जोडरस्ता ठरणार आहे.

Swapnil S

मुंबई : गोरेगाव मुलुंड लिंक रोड मुळे उपनगरातील वाहतूक कोंडी फुटणार आहे. जीएमएलआर प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून ३१ मे २०२६ पर्यंत पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे निर्देश पालिका प्रशासनाने दिले आहेत. मात्र सुधारित बोगदा रचनेमुळे प्रकल्पाच्या खर्चात एक हजार कोटींनी वाढ झाली आहे.

दरम्यान, प्री-कास्ट डेक स्लॅब व्यवस्थेसह सुधारित बोगदा रेखांकन स्वीकारण्यात आल्याने हा खर्च वाढल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पूर्व व पश्चिम उपनगरांना जोडणारा जीएमएलआर हा महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून तो मुंबईतील चौथा पूर्व–पश्चिम जोडरस्ता ठरणार आहे. या प्रकल्पामुळे गोरेगाव येथील पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि मुलुंड येथील पूर्व द्रुतगती महामार्ग थेट जोडले जाणार असून उपनगरांतील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.

असा आहे प्रकल्प

या प्रकल्पाची एकूण लांबी १२.२ किलोमीटर आहे. यामध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जमिनीखाली ५.३ किलोमीटर लांबीचा भूमिगत दुहेरी बोगदा प्रस्तावित आहे तसेच गोरेगाव फिल्मसिटी परिसरात कट-अँड-कव्हर पद्धतीचा १.३२ किलोमीटर लांबीचा बोगदा व पोहोच रस्ते उभारण्यात येणार आहेत.

प्रकल्पाचे २० टक्के काम पूर्ण

जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेड आणि नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनी यांची या कामासाठी नेमणूक करण्यात आली असून सुरुवातीला विविध करांसह १३,८९१.१२ कोटींचा खर्च मंजूर करण्यात आला. प्रकल्प नोव्हेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. सध्या प्रकल्पाचे २० टक्के काम पूर्ण झाले आहे.

आपत्कालीन सुटकेचा मार्ग

सुधारित बोगदा रेखांकनात प्री-कास्ट डेक स्लॅब प्रणालीचा समावेश करण्यात आल्यामुळे रस्त्याखाली अतिरिक्त मोकळी जागा उपलब्ध होणार आहे. ही जागा भविष्यात संभाव्य आपत्कालीन सुटकेच्या मार्गासाठी वापरता येणार आहे.

ठाण्यात ४० टक्के पाण्याची गळती; आमदार संजय केळकर यांचा आरोप

Mumbai : उच्च न्यायालयाचा पोलीस अधिकाऱ्याला २५ हजारांचा दंड; FIR ची प्रत नाकारणे अधिकाऱ्याला भोवले

वळगणीच्या 'चिवनी' मच्छीला ग्राहकांची पसंती; अवघ्या २० ते २५ दिवसांचीच उपलब्धता; बाजारात मोठी मागणी

मुंबईकरांना मिळणार पुनर्प्रक्रिया केलेले पिण्यायोग्य पाणी; भांडुपमध्ये तृतीय स्तरावरील प्रक्रिया केंद्राला मंजुरी, १ हजार ८२४ कोटींचा प्रकल्प

Mumbai : वन्यजीव तस्करी टोळीचा DRI कडून पर्दाफाश; बंदिस्त अवस्थेतील दुर्मिळ प्राण्यांची सुटका