उष्णतेच्या लाटेचा इशारा मुंबई तापली! ठाणे, पालघर जिल्ह्यातील पारा ३८ अंश सेल्सिअस पार छायाचित्र : सलमान अनसारी
मुंबई

मुंबई तापली! उष्णतेच्या लाटेचा इशारा; ठाणे, पालघर जिल्ह्यातील पारा ३८ अंश सेल्सिअस पार

मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. मंगळवारी उष्णतेच्या लाटेचा (हिट वेव्ह) इशारा देण्यात आला असून पारा ३८ अंश सेल्सिअसवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. मंगळवारी उष्णतेच्या लाटेचा (हिट वेव्ह) इशारा देण्यात आला असून पारा ३८ अंश सेल्सिअसवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कुलाबा हवामान विभागाने या चारही जिल्ह्यांतील नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे. दरम्यान, फेब्रुवारीपासूनच उन्हाचे चटके बसत असून नागरिकांचा घामटा निघत आहे. सोमवारी मुंबईचा पारा ३८.०४ अंश सेल्सिअसवर पोहोचला.

मुंबईसह राज्यातील तापमानात वाढ होत असून मंगळवारी मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील पारा ३७ अंश सेल्सिअस पार जाण्याचा इशारा कुलाबा हवामान विभागाने दिला आहे.‌ दरम्यान, ‘हिट वेव्ह’चा इशारा देण्यात आला असून दुपारी १२ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत शक्यतो घरातून बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन कुलाबा हवामान विभागाचे अधिकारी सुषमा नायर यांनी केले आहे. दोन आठवड्यापासून मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यातील तापमानात वाढ झाल्याने अंगांची लाही लाही होत आहे. त्यातच पुन्हा एकदा तापमानात वाढ होत असून हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान जाण्याची शक्यता आहे. दमट वातावरणामुळे उष्णतेचा त्रास अधिक जाणवू शकतो. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

‘हिट वेव्ह’मुळे आरोग्यावर परिणाम

  • मनुष्य व पक्ष्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.

  • शरीरातील पाणी कमी होते आणि थकावट, चक्कर येते, डोके दुखते, घाम येतो.

  • तणावात वाढ, फिट येणे, ताप येणे असा त्रास होऊ शकतो.

Nagpur : जलशुद्धीकरण केंद्रात मध्यरात्री क्लोरीन वायूची गळती; ४० हून अधिक जण रुग्णालयात दाखल, VIDEO

'खेलो मुंबई' ॲपद्वारेच होणार नोंदणी; ॲडव्हान्स्ड स्मार्ट टर्फ धोरण लवकरच लागू; पालिका सभागृहाची मंजुरी

Ulhasnagar: घरे-दुकानांवरील 'रुंदीकरणाची टांगती तलवार' दूर होणार; ३६ ऐवजी २४ मीटरचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे

माथेरानमध्ये साथीच्या आजारांचा उद्रेक; दररोज ३० ते ४० रुग्णांवर उपचार; तातडीच्या उपाययोजनांची मागणी

कोळंबीसह ओल्या बोंबीलची आवक वाढली; मासळी बाजारात ग्राहकांची गर्दी; खवय्यांमध्ये उत्साहाचे वातावरण