ANI
मुंबई

Mumbai Rain : मुसळधार पावसाचा जोर कायम; मुंबईत उद्याही रेड अलर्ट जारी, सर्व शाळांना सुट्टी जाहीर

राजधानी मुंबईत मुसळधार पावसाने कहर केला आहे. रस्ते जलमय होऊन वाहतूक विस्कळीत झाली असून नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने मंगळवारीही (दि. १९) शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. हवामान खात्याने उद्याही रेड अलर्ट जारी केला आहे.

नेहा जाधव - तांबे

राजधानी मुंबईत मुसळधार पावसाने कहर केला आहे. रस्ते जलमय होऊन वाहतूक विस्कळीत झाली असून नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने मंगळवारीही (दि. १९) शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. हवामान खात्याने उद्याही रेड अलर्ट जारी केला आहे.

पावसाचा जोर पाहता मुंबईतील सर्व शासकीय, खासगी आणि महानगरपालिका शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आज दुपारी ठाण्यात हा निर्णय दिल्यानंतर मुंबईतील परिस्थितीचा अंदाज पाहून मुंबईतील शाळांबाबत निर्णय देण्यात येईल असे प्रशासनामार्फत जाहीर करण्यात आले होते.

हवामान खात्याने उद्या मुंबईसाठी ‘रेड अलर्ट’ दिला आहे. तसेच, आवश्यकतेनुसार मदतीसाठी नागरिकांनी १९१६ या बीएमसी मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

ठाणे जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. जिल्ह्यात आज आणि उद्या सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. नवी मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने देखील परिपत्रक काढून शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. दरम्यान, रायगड जिल्ह्यात सतत पावसाचा जोर कायम आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी उद्या सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयांना सुट्टी घोषित केली आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

'विद्यार्थी, मूर्ख आणि अंधभक्त...'; राहुल गांधींच्या वक्तव्याने लोकसभेत गोंधळ, कामकाज काही काळ ठप्प

CJP Protest : 'आक्षेपार्ह पोस्ट हटवा'; दिल्ली पोलिसांची X ला नोटीस

Mumbai : आक्षेपानंतरही सेव्हन हिल्सचा प्रस्ताव मंजूर; सुधार समितीत खासगीकरणाला विरोधकांचा विरोध

Mumbai : सत्ताधारी-विरोधकांच्या सेवेत महागड्या गाड्या; सभागृह नेते, विरोधी पक्षनेत्यांना मिळणार नव्या कोऱ्या इनोव्हा

नवी मुंबईतील १२,६८७ अनधिकृत बांधकामांवर हातोडा; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेचे पाऊल, नागरिकांना सतर्कतेचा इशारा