Mumbai : कुर्ल्यात जलवाहिनी बिघाडाचा फटका; दुरुस्ती पूर्ण, तरीही अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठ्याची शक्यता (Photo-X)
मुंबई

Mumbai : कुर्ल्यात जलवाहिनी बिघाडाचा फटका; दुरुस्ती पूर्ण, तरीही अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठ्याची शक्यता

दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले असून, पाणीपुरवठा पूर्ववत होण्यासाठी काही वेळ लागणार आहे. त्यामुळे काही भागांमध्ये उशिराने आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

किशोरी घायवट-उबाळे

मुंबईतील कुर्ला परिसरात १,२०० मिमी व्यासाची जलवाहिनी खराब झाल्याने रविवारी (दि.७) अनेक भागांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला होता. टिळक नगर नाल्याजवळ झालेल्या या बिघाडामुळे कुर्ला आणि लगतच्या परिसरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला. बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून (BMC) युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले असून, पाणीपुरवठा पूर्ववत होण्यासाठी काही वेळ लागणार आहे. त्यामुळे काही भागांमध्ये उशिराने आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

जलवाहिनी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर

पालिकेच्या माहितीनुसार, खराब झालेल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम शनिवारी रात्रीपासून सुरू करण्यात आले असून रविवारीही ते सुरू होते. दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत प्रभावित भागांमध्ये दिवसभर पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे.

कमी दाबाने पाणीपुरवठ्याची शक्यता

BMC प्रशासनाने सांगितले की, दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतरही वितरण व्यवस्था पूर्ववत होण्यासाठी काही वेळ लागू शकतो. त्यामुळे सोमवार (दि.८) रोजी अनेक भागांमध्ये उशिराने आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

कोणते भाग प्रभावित?

या बिघाडाचा परिणाम अशोक विहार, बामणवाडा पाडा, सोनानी नगर, टिळक नगर, राजू नगर, वीर सावरकर नगर, महात्मा फुले नगर, तानाजी नगर, जरीमरी, कुर्ला-अंधेरी रोड, घाटकोपर-अंधेरी लिंक रोड, सत्य नगर, काजूपाडा, घासवाला कंपाऊंड, सुंदरबाग, नवपाडा, मिलिंद नगर, प्रीमियर रोड, ख्रिश्चन गाव, म्हाडा कॉलनी, बैल बाजार, संदेश नगर, क्रांती नगर, ब्राह्मणवाडी, बुद्ध कॉलनी, पटेलवाडी, टॅक्सीमन कॉलनी, कापडिया नगर, लाईन गार्डन, स्टेशन रोड आणि चाफे गल्लीसह अनेक भागांवर झाला आहे.

नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन

पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, नियमित पाणीपुरवठा शक्य तितक्या लवकर पूर्ववत करण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. तोपर्यंत नागरिकांनी पाण्याचा जपून आणि नियोजनपूर्वक वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हजारो नागरिकांवर परिणाम होण्याची शक्यता

या पाणीपुरवठा खंडित होण्याचा परिणाम कुर्ला आणि परिसरातील हजारो कुटुंबे, गृहनिर्माण संस्था आणि व्यावसायिक आस्थापनांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जलवाहिनीचे जाळे पूर्णपणे सुरळीत होईपर्यंत काही भागांमध्ये पाणीपुरवठा प्रभावित राहू शकतो, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

आजचे राशिभविष्य, २६ जुलै २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Google Account Recovery : पासवर्ड विसरलात? आता सेल्फी व्हिडिओने मिळणार अकाउंटचा ॲक्सेस; Google चे नवे फीचर

हिरवी, पिवळी, लाल... कोणती ढोबळी मिरची सर्वाधिक पौष्टिक? जाणून घ्या नेमका फरक

महागडे लिपबाम विसरा! गुलाब पाकळ्यांपासून घरीच बनवा नैसर्गिक लिपबाम; ओठ राहतील मऊ आणि गुलाबी

मोठी बातमी! अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांचा राजीनामा