Mumbai : लोकलमध्ये जागेच्या वादातून चाकू हल्ला 
मुंबई

Mumbai : लोकलमध्ये जागेच्या वादातून चाकू हल्ला

मुंबईत धावत्या लोकलमध्ये जागेवरून झालेल्या वादातून एका व्यक्तीवर चाकूने हल्ला केल्याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Swapnil S

मुंबई : मुंबईत धावत्या लोकलमध्ये जागेवरून झालेल्या वादातून एका व्यक्तीवर चाकूने हल्ला केल्याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. सीएसएमटी - खोपोली लोकलमध्ये ही घटना गुरुवारी सकाळी घडली.

कर्जतच्या शासकीय रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) घटनेच्या १२ तासांत दोन आरोपींना अटक केली असून, आणखी एका आरोपीचा शोध सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. सतीश कुमार बोलामणी पाठक (२६, रा. मशीद बंदरई) असे जखमी प्रवाशाचे नाव आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

लोकलने वांगणी स्टेशन ओलांडल्यानंतर मालवाहू डब्यात बसण्यावरून पाठक आणि तरुण मुलांच्या एका गटामध्ये वाद सुरू झाला. हा वाद चिघळल्यानंतर त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपींनी पाठकला अमानुषपणे मारहाण केली, तर त्यापैकी एकाने त्याच्या पोटात चाकूने वार केले.

गुप्त माहितीच्या आधारे कर्जत जीआरपीने इम्रान इद्रिस अन्सारी आणि करण कन्हैयालाल अग्रवाल यांना अटक केली आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

IND vs AFG 1st ODI : अफगाणिस्तानविरुद्ध धरमशाला येथे पहिला सामना; रोहितसह भारताच्या कामगिरीकडे आज लक्ष

Latur : सरकारने बैल दिला की थट्टा केली? औत लावताच आजारी बैलाने मान टाकली, लातूरच्या शेतकऱ्याची नव्या बैलाची मागणी

डिझेल विक्रीवर मर्यादा! दिवसाला मिळणार केवळ २०० लिटर

तडजोडवादी पंतप्रधानांकडून भारतीयांचे रक्षण अशक्य; भारतीय खलाशांच्या मृत्यूवरून राहुल गांधींचा मोदींवर घणाघात

विलीनीकरणाचा फायदा भाजपलाच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; पंडित नेहरू-पंतप्रधान मोदी यांच्यात तुलना नाही