संग्रहित छायाचित्र  
मुंबई

मुंबईत पावसाचा मुक्काम; ठाणे, पालघरमध्ये मुसळधार

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर सक्रिय झालेल्या मान्सूनने मुंबई, कोकणसह राज्याच्या अनेक भागांना रविवारी चांगलेच झोडपून काढले. हवामान खात्याने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसासाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

Swapnil S

मुंबई : काही दिवसांच्या विश्रांतीनंतर सक्रिय झालेल्या मान्सूनने मुंबई, कोकणसह राज्याच्या अनेक भागांना रविवारी चांगलेच झोडपून काढले. हवामान खात्याने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसासाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत रविवारी सकाळनंतर पुन्हा पावसाने जोर पकडल्याने काही भागांत पाणी साचले. यामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी झाली. मात्र नंतर पावसाने विश्रांती घेतल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला.

पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोकण आणि गोवा येथे अचानक पूर येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. गेल्या तीन दिवसांत वैभववाडी तालुक्यात ३९३ मिमी, तर कुडाळमध्ये ३६५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

ठाकरे बंधूंची यंदा 'एकत्र' दिवाळी! मनसे दीपोत्सवाचे उद्घाटन उद्धव ठाकरेंच्या हस्ते

वडिलांपेक्षा मुलगा वयाने मोठा कसा? सर्वपक्षीय शिष्टमंडळाची निवडणूक आयोगासमोर प्रश्नांची सरबत्ती, राज ठाकरेंच्या प्रश्नांनी वेधले लक्ष

IPS पूरन कुमार प्रकरणाला नवे वळण; तपास करणाऱ्या IAS अधिकाऱ्याचीही आत्महत्या, सुसाइड नोटमध्ये गंभीर आरोप

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण : मुख्य आरोपी वीरेंद्र तावडेसह दोघांना जामीन

जैसलमेरमध्ये भीषण अपघात; खासगी बसला अचानक लागली आग, गाडी जळून खाक, ५७ जण करत होते प्रवास