संग्रहित छायाचित्र  
मुंबई

मुंबईत पावसाचा मुक्काम; ठाणे, पालघरमध्ये मुसळधार

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर सक्रिय झालेल्या मान्सूनने मुंबई, कोकणसह राज्याच्या अनेक भागांना रविवारी चांगलेच झोडपून काढले. हवामान खात्याने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसासाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

Swapnil S

मुंबई : काही दिवसांच्या विश्रांतीनंतर सक्रिय झालेल्या मान्सूनने मुंबई, कोकणसह राज्याच्या अनेक भागांना रविवारी चांगलेच झोडपून काढले. हवामान खात्याने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसासाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत रविवारी सकाळनंतर पुन्हा पावसाने जोर पकडल्याने काही भागांत पाणी साचले. यामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी झाली. मात्र नंतर पावसाने विश्रांती घेतल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला.

पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोकण आणि गोवा येथे अचानक पूर येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. गेल्या तीन दिवसांत वैभववाडी तालुक्यात ३९३ मिमी, तर कुडाळमध्ये ३६५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

दिल्लीत ५ मजली PG इमारत जमीनदोस्त; एकाचा मृत्यू, अनेक विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

VIDEO : जखमी गोविंदांच्या उपचारावरून पालघरच्या रुग्णालयात कर्मचाऱ्याला मारहाण; शिवसेना आमदार पुत्रासह १७ जणांवर गुन्हा

जन्माष्टमीच्या रात्री संतापजनक प्रकार! मंदिरात जात असलेल्या १४ वर्षीय मुलीचं अपहरण अन्...

Mumbai : गणेशभक्तांना दिलासा; मध्यरात्रीपर्यंत धावणार ॲक्वा लाईन मेट्रो, जाणून घ्या वेळ

Delhi : उशिरा घरी परतल्याने कुटुंबीय रागावले; १३ वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल