मुंबई

मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने २१५ झोपडपट्ट्या केल्या जमीनदोस्त

प्रतिनिधी

गोवंडी परिसरातील एका खासगी मोकळ्या जागेवर अनधिकृतरित्या बांधण्यात आलेल्या सुमारे २१५ झोपडपट्ट्या मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने जमीनदोस्त केल्या आहेत.

गोवंडी परिसरात प्रभाग क्रमांक १४४ मधील सीटीएस क्रमांक ५/६, देवनार गांव, पाटीलवाडी येथे खासगी मोकळ्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत झोपड्या बांधल्याची तक्रार महानगरपालिका प्रशासनाकडे प्राप्त झाली होती. त्यावर प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करून सुमारे २१५ अनधिकृत झोपडीधारकांना नोटीस बजावली. नोटीसधारकांनी या अनधिकृत झोपड्यांना निष्कासित होण्यापासून संरक्षण मिळावे म्हणून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, महानगरपालिकेच्या सतर्कतेमुळे व प्रभावी युक्तिवादामुळे न्यायालयाने स्थगिती आदेश दिले नाहीत आणि नोटीसधारकांची याचिका देखील फेटाळून लावली.

न्यायालयाच्या निर्णयानंतर, महानगरपालिकेतर्फे ३० एप्रिल २०२२ रोजी नोटीसधारकांना अंतिम आदेश पारित करण्यात आले. त्यानंतर या सर्व २१५ झोपड्यांचे मंगळवारी निष्कासन करण्यात आले. एम/पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त महेंद्र उबाळे यांच्या नेतृत्वाखाली २ जेसीबी संयंत्र व २० कामगार यांच्या मदतीने ही निष्कासनाची कारवाई करण्यात आली. याप्रसंगी गोवंडी पोलीस ठाण्याकडून पोलीस बंदोबस्त पुरविण्यात आला होता.

Mumbai : इलेक्ट्रिक बाइक टॅक्सी सेवा आजपासून सुरू; एक किमीला १५ रुपये भाडे; राज्य परिवहन प्राधिकरणाची परवानगी

पाकिस्तानची भारताविरोधात तक्रार; लढतीनंतर हस्तांदोलन न केल्यामुळे नाराजी; सामनाधिकाऱ्यावरही कारवाईची मागणी

SRA ला फटकारले! खासगी मालकीची जमीन झोपडपट्टी कशी? प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे न्यायालयाचे आदेश

राजकीय पक्षांच्या कार्यालयांना ‘पॉश’ कायद्यातून वगळले; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

सर्व नियमांचे पालन, बदनाम करू नका; ‘वनतारा’ला सुप्रीम कोर्टाची क्लीनचिट