संग्रहित छायाचित्र
मुंबई

धरणांची पातळी खालावली; मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट ओढवण्याची शक्यता, सातही धरणांमध्ये उरला फक्त...

कडक उन्हामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये बाष्पीभवन होत आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची पातळी कमी होत आहे. त्यामुळे मुंबईकरांवर येत्या एप्रिल आणि मे महिन्यामध्ये पाणीकपातीचे संकट ओढवण्याची शक्यता आहे.

Krantee V. Kale

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये कडक उन्हामुळे बाष्पीभवन होत आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची पातळी कमी होत आहे. सध्या या धरणांमध्ये एकूण ४२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे मुंबईकरांवर येत्या एप्रिल आणि मे महिन्यामध्ये पाणीकपातीचे संकट ओढवण्याची शक्यता आहे.

मार्चच्या सुरुवातीला उन्हाने डोके वर काढले आहे. त्याचा परिणाम मुंबईकरांसह मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरण क्षेत्रात देखील होत आहे. मुंबईला मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, विहार, तुळशी आणि राज्य सरकारच्या अप्पर वैतरणा, भातसा या सात धरणांतून पाणीपुरवठा होतो. धरणाची क्षमता १४ लाख ४७ हजार ३७७ दशलक्ष लिटर आहे. या धरणांतून मुंबईला दररोज ३ हजार ८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा विविध जलवाहिन्यांद्वारे करण्यात येतो. राज्य सरकारच्या आखत्यारित असलेल्या अप्पर वैतरणा आणि भातसामध्ये आपत्कालीन परिस्थितीसाठी राखीव साठाही कायम असतो. हा साठा उपलब्ध करण्यासाठी राज्य सरकार निर्णय घेते. राखीव कोट्यातून प्रत्येकी ७५ हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध होतो.

धरणांतील पाणीसाठा किती?

दर्जाहीन कृत्रिम वाळूवर टाच! एम-सँड धोरणात मोठी सुधारणा; अंमलबजावणीचे अधिकार शासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांना; निर्णय जारी

Mumbai News : मध्य आणि पश्चिम रेल्वेवर BMC मेहेरबान; रेल्वेकडे ५०० कोटी रुपयांचे पाणी बिल थकीत!

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या निधीची चौकशी होणार; राज्य सरकारकडून निधी तपासण्याचे आदेश

महाराष्ट्राचे स्वप्न साकार झाले; ठाण्यातील ‘त्या’ फलकाची चर्चा!

कर्नाटकमधील सिद्धरामय्या सरकारला हायकोर्टाचा दणका; ‘आरएसएस’ला लक्ष्य करण्याच्या निर्णयाला स्थगिती