Mumbai : वरळी मेट्रो स्थानकात गळती; ए-२ प्रवेशद्वार दुरुस्तीसाठी दोन दिवस बंद 
मुंबई

Mumbai : वरळी मेट्रो स्थानकात गळती; ए-२ प्रवेशद्वार दुरुस्तीसाठी दोन दिवस बंद

मुंबई मेट्रो लाइन ३ (ॲक्वा लाइन) वरील वरळी स्थानकाच्या एका प्रवेशद्वारावर मुसळधार पावसानंतर पाणी गळती दिसून आल्यामुळे ते तात्पुरते बंद करण्यात आले.

प्रतिनिधी

स्वीटी भागवत, मुंबई

मुंबई मेट्रो लाइन ३ (ॲक्वा लाइन) वरील वरळी स्थानकाच्या एका प्रवेशद्वारावर मुसळधार पावसानंतर पाणी गळती दिसून आल्यामुळे ते तात्पुरते बंद करण्यात आले. त्यामुळे दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत प्रवाशांना पर्यायी प्रवेशद्वारांचा वापर करावा लागत आहे. मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार मान्सूनच्या पावसात ही गळतीची घटना समोर आली आहे.

३३.५ किमी लांबीचा पूर्णपणे भूगर्भातील हा मेट्रो प्रकल्प ३७, २७६ कोटी रुपयांच्या अंदाजित खर्चातून उभारण्यात आला असून, हा भारतातील सर्वात महागड्या शहरी वाहतूक प्रकल्पांपैकी एक आहे.

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. ने एक्सवर दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून 'ग्लॅक्सो' बाजूकडील स्वतंत्र जिना आणि लिफ्ट असलेले 'एन्ट्री ए २' बंद करण्यात आले आहे. २ जुलैपासून दुरुस्तीचे काम सुरू असून, हे प्रवेशद्वार ७ जुलै २०२६ पर्यंत बंद राहील.

मात्र, या तात्पुरत्या बंदीवर प्रवाशांकडून टीका होत आहे. मुंबईतील प्रसिद्ध डॉक्टर ईश्वर गिलाडा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या त्रासाकडे लक्ष वेधले आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये आरोप केला की, सामानासह चार मजले खाली उतरल्यानंतर, 'ए२' लिफ्ट बंद असल्यामुळे त्यांना दुसऱ्या जिन्याचा वापर करावा लागला. त्यांनी भिंतींचे नुकसान झालेले पॅनल्स आणि जिन्यावर पडलेला बांधकामाचा कचरा यामुळे घसरण्याची भीती व्यक्त केली. तसेच, हा मेट्रो मार्ग गेल्या वर्षीच कार्यान्वित झाला असतानाही बांधकामाच्या गुणवत्तेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

डॉ. गिलाडा फ्री प्रेसला सांगितले की, ते वरळी ते एअरपोर्ट स्थानकाकडे श्रीनगरच्या फ्लाईटसाठी प्रवास करत होते. त्यांनी असा दावा केला की, स्थानकातील लिफ्ट बंद होती आणि प्रवेशद्वाराजवळ मेट्रोच्या स्लॅबचा काही भाग कोसळल्यामुळे जमिनीवर मलबा पडला होता, ज्यामुळे त्या ठराविक भागातून चालण्यासाठी खूप कमी जागा उरली होती.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

कोसळधार! मुंबई, ठाणे, पालघरमध्ये आज 'ऑरेंज अलर्ट'; शाळा-कॉलेज बंद

Mumbai : ७ दिवसांत ५५० हून अधिक झाडांची पडझड

रायगड जिल्ह्यात हाहाकार! मुंबई-गोवा महामार्ग ८ तास ठप्प; अंबा, कुंडलिका, पाताळगंगाने ओलांडली धोका पातळी

पंडवानी गायिका डॉ. तीजन बाई यांचे निधन; छत्तीसगडच्या दिग्गज कलावतीने महाभारताच्या सादरीकरणाला दिली जागतिक ओळख

जुलै महिना कसा जाईल? बघा कुंभ आणि मीन राशीचे भविष्य