मुंबई

मुंबईकरांची चिंता वाढली,कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ

कोरोना रुग्णसंख्येने बुधवारी अचानक मोठी वाढ नोंदवल्याने आरोग्य यंत्रणांची धास्ती वाढली आहे

प्रतिनिधी

देशभरासह महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. बुधवारी राज्यात व मुंबई शहरात कोरोना रुग्णसंख्येने मोठी उसळी घेतल्याने चिंता वाढली आहे. गेले काही दिवस हळूहळू वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येने बुधवारी अचानक मोठी वाढ नोंदवल्याने आरोग्य यंत्रणांची धास्ती वाढली आहे. गेल्या २४ तासांमध्ये राज्यात ४,०२४ नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून मुंबईत २,२९३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत मंगळवारच्या तुलनेत बुधवारी रुग्णसंख्येत ५०० हून अधिक वाढ नोंदवली गेली आहे. राज्यात कोरोनामुळे बुधवारी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३,०२८ जण कोरोनातून बरे झाले आहेत. महाराष्ट्रात सध्या १९,२६१ सक्रिय रुग्ण आहेत. दरम्यान, पुण्यातील बी.जे. मेडिकल कॉलेजच्या माहितीनुसार, बीए ५ व्हेरियंटचे ४ रुग्ण आढळले आहेत. राजधानी मुंबईत बुधवारी २,२९३ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून मुंबईत एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

राज्यात शाळा सुरू झाल्यामुळे १२ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण झाले नसल्यास ते पूर्ण करून घेण्याच्या सूचना पालकांना तसेच शिक्षकांना करण्यात येत आहेत. तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याचे आवाहनही टोपे यांनी राज्यातील जनतेला केले आहे.

''तेव्हाच थांबायला हवं होतं''; प्रकाश महाजन यांची मनसेला सोडचिठ्ठी, नाराजीचे कारण समोर

भारत-पाकिस्तान सामना : ''देशभक्तीचा व्यापार सुरू''; उद्धव ठाकरे यांचे भाजपवर टीकास्त्र

"BCCI च्या कुटुंबाचं कोणी मेलं नाही"; भारत-पाक सामन्यावर भडकली पहलगाम हल्ल्यातील पिडीतेची पत्नी; क्रिकेटर, स्पॉन्सर्सना घेतलं धारेवर

रक्त व क्रिकेट एकत्र कसे असू शकते? भारत-पाकिस्तान सामन्यावरून आदित्य यांची टीका

संपूर्ण देशात फटाक्यांवर बंदी हवी; सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी; स्वच्छ हवा मिळणे हा सर्व नागरिकांचा हक्क