मुंबई

समुद्रातील प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेची धाव;प्रकल्पासाठी ८३ कोटींचा खर्च

नाल्यातून समुद्रात जाणाऱ्या घाण पाण्यामुळे समुद्राला प्रदूषणाचा धोका निर्माण होतो.

प्रतिनिधी

निरी व आयआयटीच्या मदतीने मुंबईतील नाल्यातील पाणी शुद्ध करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. ‘इन सिटू ट्रिटमेंट’द्वारे नाल्यातून समुद्रात जाणारा कचरा रोखला जाणार आहे. यामुळे समुद्रात निर्माण होणारे प्रदूषण रोखणे हा मुख्य उद्देश असल्याचे मुंबई मलनि:सारण प्रकल्पाचे मुख्य अभियंता अशोक मेंगडे यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकल्पासाठी ८३ कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

नाल्यातून समुद्रात जाणाऱ्या घाण पाण्यामुळे समुद्राला प्रदूषणाचा धोका निर्माण होतो. राष्ट्रीय हरित लवादाने यासाठी मुंबई महापालिकेला २८ लाखांचा दंड ठोठावला असून, सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. तरीही राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या आदेशानुसार समुद्रात जाणारे घाण पाणी रोखण्यासाठी पम्पिंग स्टेशनच्या माध्यमातून स्वच्छ करण्यात येते. पम्पिंग स्टेशनद्वारा समुद्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करण्यास वेळ लागतो. त्यामुळे आता नाल्यातील पाणी शुद्ध करण्यासाठी निविदा मागवल्या आहेत. निविदा प्रक्रियेला प्रतिसाद मिळाल्यानंतर पुढील पाच वर्षांसाठी हा प्रकल्प राबवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. नाल्यातील पाणी स्वच्छ करण्यासाठी १०० टक्के शिवरेज नेटवर्क सुरू आहे.

रेमंड ग्रुपचे माजी अध्यक्ष विजयपत सिंघानिया अनंतात विलीन; पुत्र गौतम सिंघानिया यांनी दिला मुखाग्नी

प्रवाशांसाठी खुशखबर! नवी मुंबई विमानतळावरून इंडिगोच्या ३० पेक्षा जास्त फ्लाइट्स सुरू; देशभरात कनेक्टिव्हिटी वाढणार

Mumbai : गॅस सेवांच्या नावाखाली सायबर फसवणूक; APK फाइलने काही मिनिटांत बँक खाती रिकामी, काय काळजी घ्यावी?

Maharashtra Weather Update : राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा; शेतकऱ्यांना सतर्कतेचे आवाहन

ठाणे जिल्ह्यात प्रति कुटुंब तीन लिटर रॉकेल; ग्रामीण भागासाठी रॉकेलचा कोटा मंजूर