मुंबई

नायर रुग्णालयातील एमआरआय मशीन बिघडल्याने रुग्णांना ताप

Swapnil S

स्वप्नील मिश्रा/मुंबई : मुंबई मनपाच्या नायर रुग्णालयातील एमआरआय मशीन बिघडल्याने रुग्णांच्या डोक्याला ताप झाला आहे. कारण या रुग्णांना एमआरआय करण्यासाठी खासगी निदान केंद्रात जावे लागत आहे.

गेल्या डिसेंबरपासून नायर रुग्णालयातील एमआरआय मशीन नादुरुस्त आहे. या मशीनला लागणारा हेलियम गॅस व सुटे भाग उपलब्ध झालेले नाहीत. तसेच ही मशीन दुरुस्त करायला तंत्रज्ञ मिळत नाहीत. रोज ३० रुग्णांना एमआरआय करण्याची शिफारस केली जाते.

मुंबई मनपाने गेल्या सप्टेंबरमध्ये एमआरआय मशीन बिघडल्यावर १५ लाख रुपयांचा हेलियम गॅस खरेदी केला होता. तसेच या मशीनचे देखभालीचे कंत्राट जानेवारीपर्यंत होते. त्यानंतर उत्पादकाने त्याची देखभाल करण्यास नकार दिला. पण, रुग्णालयाच्या सूत्रांनी हे मशीन वापरण्याचा सल्ला दिला. तसेच नवीन मशीन खरेदीची निविदा काढल्याचे सांगितले. पण, केव्हा येईल, याचा तपशील देण्यास असमर्थता दर्शवली.

नायरचे अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर म्हणाले की, या मशीनला अडचणी येत आहेत. यातील नेमका कोणता पार्ट खराब झालेला आहे, त्याचे कारण कळू शकत नाही. आम्ही आठवड्यात दोन वेळा हेलियम वायू आणला. नवीन एमआरआय मशीन आणेपर्यंत किंवा जुने मशीन दुरुस्ती होईपर्यंत रुग्णांना मुंबई मनपाच्या अन्य रुग्णालयात पाठवले जात आहे. रुग्णालयाच्या शेजारील एमआरआय मशीन केंद्रे मुंबई मनपाच्याच दरात सेवा पुरवत आहेत. त्यांनी वाडिया रुग्णालयासोबत करार केला आहे, असे ते म्हणाले.

एमआरआय मशीन बिघडणे ही बाब पहिल्यांदा झालेली नाही. नायर रुग्णालयातील या बिघाडामुळे नागरिकांच्या होत असलेल्या गैरसोयीला ‘नवशक्ति’ने वाचा फोडली आहे. रेडिओलॉजिकल डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, एमआरआय मशीनबाबत आम्ही वेळोवेळी वरिष्ठांना सांगितले आहे. तरीही हा प्रश्न सोडवलेला नाही.

नरेंद्र मोदींच्या डोक्यात घातला जिरेटोप; नव्या वादाला फुटले तोंड, शिवरायांचा अपमान केल्याची मविआची टीका

"प्रफुल्ल पटेल लाज बाळगा..."; मोदींच्या डोक्यात जिरेटोप घातल्यावरून शरद पवार गटाच्या नेत्याने सुनावले खडेबोल

मुंबईतील धक्कादायक प्रकार! कॅफे म्हैसूरच्या मालकाला 'खाकी'चा धाक दाखवून लुटलं, खऱ्याखुऱ्या पोलिसाचाही कटात समावेश

Flying Taxi : आता उडत जायचं! भारतात सुरू होतेय फ्लाइंग टॅक्सी, आनंद महिंद्रांनी शेअर केले डिटेल्स

"बीडमध्ये इनकॅमेरा फेरमतदान घ्या..." बजरंग सोनवणेंचं निवडणूक आयोगाला पत्र