मुंबई

नोरा फतेची ‘ईडी’ कडून तब्बल सहा तास कसून चौकशी

सुकेश चंद्रशेखरने नोरा फतेही आणि जॅकलिन फर्नांडिस यांना आलिशान कारसह अनेक महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या

प्रतिनिधी

तिहार तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखर याच्याशी संबंधित मनीलाँड्रिंग प्रकरणात अभिनेत्री आणि नृत्यांगना नोरा फतेही हिची दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी केली आहे. २०० कोटींच्या मनीलाँड्रिंग प्रकरणात आरोपी सुकेश चंद्रशेखरने नोरा फतेही आणि जॅकलिन फर्नांडिस यांना आलिशान कारसह अनेक महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या, असे ‘ईडी’च्या तपासात आढळले आहे.

नोरा फतेही हिची पोलिसांनी चौथ्यांदा तब्बल सहा तास कसून चौकशी केली. तिला ५० प्रश्न विचारण्यात आले होते. यात सुकेशकडून भेटवस्तू कधी घेतल्या? तू त्याला कुठे भेटली? असे काही प्रश्न होते. संपूर्ण चौकशीत नोराने पोलिसांना सहकार्य केले. याप्रकरणी तीन दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला समन्स बजावले आहे. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी जॅकलिन फर्नांडिसला २६ सप्टेंबर रोजी दिल्लीच्या पतियाळा न्यायालयात हजर राहावे लागणार आहे.

‘ईडी’ने दाखल केलेल्या आरोपपत्रानंतर जॅकलिनला समन्स बजावण्यात आले असून, आर्थिक गैरव्यवहाराचा सूत्रधार सुकेश चंद्रशेखर याच्यासमवेत तिचे कसे संबंध होते आणि २०० कोटी रुपयांपेक्षा अधिक गैरव्यवहारात आपली भूमिका काय होती, हे जॅकलिनला न्यायालयाला सांगावे लागणार आहे. याप्रकरणी नुकत्याच दाखल करण्यात आलेल्या पुरवणी आरोपपत्राचीही न्यायालयाने दखल घेतली आहे. ‘ईडी’ने दाखल केलेल्या आरोपपत्रात नवीन खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी सुकेश चंद्रशेखर याने जॅकलिनला घोडा, मांजरी आणि दागिनेच भेट दिल्याचे आपल्याला माहिती आहे; पण सुकेश याने तिच्यासाठी श्रीलंकेत घरही खरेदी केले होते, अशी माहिती समोर आली आहे. सुकेशविरोधात खटला सुरू आहे.

ZIM vs AUS: झिम्बाब्वेकडून कांगारूंची 'शिकार'! टी-२० विश्वचषकात सर्वात मोठी उलथापालथ; बलाढ्य ऑस्ट्रेलियाला चारली धूळ

रिकव्हरी एजंट्सना RBI चा दणका! कर्जवसुलीच्या दादागिरीला लगाम; १ जुलैपासून लागू होणार नवे नियम; वाचा सविस्तर

Mumbai : मानखुर्दमधील धक्कादायक घटना; अल्पवयीन मुलाचे अपहरण करून वारंवार लैंगिक अत्याचार, १९ वर्षांच्या तरुणीवर POCSO अंतर्गत गुन्हा

आम्ही आक्षेप घेतला म्हणून भारताचा ‘तो’ नकाशा अमेरिकेने हटवला...; पाकिस्तानचा दावा

BNP च्या विजयामुळे भारत-बांगलादेश संबंधांना नवी दिशा? PM मोदींनी तारीक रहमान यांचे "निर्णायक विजयाबद्दल" केले अभिनंदन