मुंबई

१५१ इमारतींचे मालक आणि रहिवाशांना मुंबई अग्निशमन दलाकडून नोटीस

प्रतिनिधी

इमारतीत अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित नसल्याने मुंबई अग्निशमन दलाने मुंबईतील १५१ इमारत मालक व रहिवाशांना नोटीस बजावली आहे. नोटीस दिल्यानंतर १२० दिवसांत अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित न केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा मुंबई अग्निशमन दलाने दिला आहे.

मुंबईत गेल्या काही दिवसांत आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून हायराईज इमारतीत आग लागण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. इमारतीत अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करत दर सहा महिन्यांनी ऑडिट रिपोर्ट मुंबई अग्निशमन दलाला सादर करणे बंधनकारक आहे. मुंबई अग्निशमन दलाने मुंबईतील ३२९ इमारतींची नोव्हेंबर, २०२१ ते एप्रिल, २०२२ या सहा महिन्यांत अग्निसुरक्षा यंत्रणेची पाहणी केली होती.

हायराईज इमारतीत आग लागण्याच्या घटनांत वाढ झाली असून, गेल्या १० वर्षांत १,५०० हून अधिक हायराईज इमारतीत आगीच्या घटना घडल्या आहेत. आगीच्या घटना टाळण्यासाठी इमारतीत फायर फायटिंग सिस्टीम कार्यान्वित करत दर सहा महिन्यांनी ऑडिट रिपोर्ट मुंबई अग्निशमन दलाला सादर करणे बंधनकारक आहे. मात्र, ३२९ इमारतींचा अहवाल न मिळाल्याने त्यांची तपासणी करण्यात आली. तपासणीत १५१ इमारतीत अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित नसल्याने कायदेशीर कारवाईची नोटीस बजावण्यात आली.

मूळ मालकाला भरपाई दिल्याशिवाय प्रकल्पाग्रस्तांना जमिनीचे वाटप अयोग्य; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

प्रल्हाद जोशी नवे केंद्रीय शिक्षणमंत्री; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर स्वीकारला पदभार

Mumbai : शिवाजी पार्कवर तरुणाईचा महासागर! ठाकरे बंधूंच्या विजय जल्लोष सभेला हजारोंची उपस्थिती; VIDEO

'ही केवळ सुरुवात, अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे'; अभिजीत दिपकेंचा नवा व्हिडीओ चर्चेत

युनेस्कोकडून सारनाथला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा; भारताच्या सांस्कृतिक वैभवात मानाचा तुरा, जाणून घ्या इतिहास अन् वैशिष्ट्ये