मुंबई

बाप्पाच्या विसर्जनासाठी काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीत धोकादायक पुलांचे विघ्न

१३ धोकादायक पुलांची यादीच पालिकेने जाहीर केली असून हे पूल धोकादायक ठरु शकते, असा इशारा दिला आहे

प्रतिनिधी

बाप्पाच्या आगमनाला फक्त १३ दिवस शिल्लक असून यंदा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करता येणार आहे. मात्र बाप्पाच्या विसर्जनासाठी काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीत धोकादायक पुलांचे विघ्न समोर आले आहे. १३ धोकादायक पुलांची यादीच पालिकेने जाहीर केली असून हे पूल धोकादायक ठरु शकते, असा इशारा दिला आहे. त्यामुळे बाप्पाच्या विसर्जनावेळी धोकादायक पुलांवरुन योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन पालिकेच्या पूल विभागाने केले आहे.

अंधेरीत ३ जुलै, २०१८ रोजी गोखले पूल कोसळून दोन जणांचा आणि १४ मार्च २०१९ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील ‘हिमालय’ पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जणांचा बळी गेल्यानंतर मुंबईतील पुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे पालिकेने मुंबईतील सर्व सुमारे ३४४ पुलांचे नव्याने स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यक छोटी-मोठी दुरुस्ती तर अतिधोकादायक पूल पाडून नव्याने बांधण्याचे धोरण आखले आहे. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवात धोकादायक पुलांवर गर्दी होऊन दुर्घटना होऊ नये यासाठी धोकादाय पुलांची यादी जाहीर केली आहे. पालिका आणि पोलिसांनी दिलेल्या सुचनेनुसारच या पुलांवरून ये-जा करावी असे निर्देशही पालिकेने दिले आहेत.

मुंबईत परतीच्या पावसावर चक्रीवादळाचं सावट! पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; हवामान खात्याचा ‘यलो अलर्ट’

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! ८व्या वेतन आयोगाच्या अटींना केंद्र सरकारची मंजूरी

‘क्लच चेस’मध्ये गुकेशचा पलटवार; हिकारू नाकामुराने केलेल्या अपमानाचा पटलावरच घेतला बदला

माज उतरला, माही खान वठणीवर आला! मनसेच्या इशाऱ्यानंतर काही तासांतच "मुंबई मेरी जान...जय महाराष्ट्र" म्हणत मागितली माफी

पंतप्रधान मोदी उद्या मुंबईत, IMW ला लावणार हजेरी; वाहतुकीत मोठे बदल - कोणते रस्ते बंद, कोणते पर्यायी मार्ग?