मुंबई

बाप्पाच्या विसर्जनासाठी काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीत धोकादायक पुलांचे विघ्न

१३ धोकादायक पुलांची यादीच पालिकेने जाहीर केली असून हे पूल धोकादायक ठरु शकते, असा इशारा दिला आहे

प्रतिनिधी

बाप्पाच्या आगमनाला फक्त १३ दिवस शिल्लक असून यंदा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करता येणार आहे. मात्र बाप्पाच्या विसर्जनासाठी काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीत धोकादायक पुलांचे विघ्न समोर आले आहे. १३ धोकादायक पुलांची यादीच पालिकेने जाहीर केली असून हे पूल धोकादायक ठरु शकते, असा इशारा दिला आहे. त्यामुळे बाप्पाच्या विसर्जनावेळी धोकादायक पुलांवरुन योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन पालिकेच्या पूल विभागाने केले आहे.

अंधेरीत ३ जुलै, २०१८ रोजी गोखले पूल कोसळून दोन जणांचा आणि १४ मार्च २०१९ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील ‘हिमालय’ पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जणांचा बळी गेल्यानंतर मुंबईतील पुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे पालिकेने मुंबईतील सर्व सुमारे ३४४ पुलांचे नव्याने स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यक छोटी-मोठी दुरुस्ती तर अतिधोकादायक पूल पाडून नव्याने बांधण्याचे धोरण आखले आहे. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवात धोकादायक पुलांवर गर्दी होऊन दुर्घटना होऊ नये यासाठी धोकादाय पुलांची यादी जाहीर केली आहे. पालिका आणि पोलिसांनी दिलेल्या सुचनेनुसारच या पुलांवरून ये-जा करावी असे निर्देशही पालिकेने दिले आहेत.

GST आता फक्त ५ आणि १८ टक्के; नवीन दराचा ‘घट’ २२ सप्टेंबरपासून

शिखर धवनला ED कडून समन्स; दोषी आढळल्यास माजी क्रिकेटपटूवर काय कारवाई होणार?

मराठा आरक्षणाच्या जीआरवरून OBC नेत्यांमध्ये मतमतांतरे; जीआर प्रत फाडत लक्ष्मण हाके यांचे आंदोलन; भुजबळांचा कोर्टात जाण्याचा इशारा

मुंबईची वाढती तहान भागवायला आणखी दोन धरणांचा प्रस्ताव

सुप्रीम कोर्टाची राज्य सरकारला नोटीस; कॉ. पानसरे यांच्या कुटुंबीयांच्या याचिकेवर निर्देश