मुंबई

बाप्पाच्या विसर्जनासाठी काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीत धोकादायक पुलांचे विघ्न

१३ धोकादायक पुलांची यादीच पालिकेने जाहीर केली असून हे पूल धोकादायक ठरु शकते, असा इशारा दिला आहे

प्रतिनिधी

बाप्पाच्या आगमनाला फक्त १३ दिवस शिल्लक असून यंदा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करता येणार आहे. मात्र बाप्पाच्या विसर्जनासाठी काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीत धोकादायक पुलांचे विघ्न समोर आले आहे. १३ धोकादायक पुलांची यादीच पालिकेने जाहीर केली असून हे पूल धोकादायक ठरु शकते, असा इशारा दिला आहे. त्यामुळे बाप्पाच्या विसर्जनावेळी धोकादायक पुलांवरुन योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन पालिकेच्या पूल विभागाने केले आहे.

अंधेरीत ३ जुलै, २०१८ रोजी गोखले पूल कोसळून दोन जणांचा आणि १४ मार्च २०१९ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील ‘हिमालय’ पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जणांचा बळी गेल्यानंतर मुंबईतील पुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे पालिकेने मुंबईतील सर्व सुमारे ३४४ पुलांचे नव्याने स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यक छोटी-मोठी दुरुस्ती तर अतिधोकादायक पूल पाडून नव्याने बांधण्याचे धोरण आखले आहे. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवात धोकादायक पुलांवर गर्दी होऊन दुर्घटना होऊ नये यासाठी धोकादाय पुलांची यादी जाहीर केली आहे. पालिका आणि पोलिसांनी दिलेल्या सुचनेनुसारच या पुलांवरून ये-जा करावी असे निर्देशही पालिकेने दिले आहेत.

...तर आमच्या देशातून तुम्हाला बाहेर काढू; भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिका सरकारचा इशारा

असंगाशी संग, आला अंगाशी! काँग्रेस, एमआयएमशी युतीनंतर भाजप बॅकफूटवर; काँग्रेसकडूनही कारवाईचा बडगा

विलासरावांबद्दल आम्हाला नितांत आदर! फडणवीसांनी सावरली रवींद्र चव्हाणांची बाजू

Chhatrapati Sambhajinagar : इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला

महापालिका निवडणुकीनंतर राज्यात मोठा भूकंप? पिंपरी-चिंचवडच्या सभेत अजित पवारांचे भाकित; दोन्ही NCP एकत्र येण्याचेही दिले संकेत