मुंबई

शिवडीत उघड्या गटारात पडून एकाचा मृत्यू; चार कामगार जखमी, एकाची प्रकृती गंभीर

मुंबई महापालिकेच्या माध्यमातून विविध प्रकल्पांची कामे सुरू आहेत. जलवाहिनी टाकणे, पर्जन्य जलवाहिनी बदलणे, रस्त्यांची, नालेसफाईची अशी कामे सुरू असून काही वेळा कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे दुर्घटना घडतात.

Swapnil S

मुंबई : उघड्या गटारात खाजगी कंत्राटदाराचे पाच कामगार पडल्याची घटना शनिवारी मध्यरात्री २.४९ वाजता शिवडी वाडी बंदर येथे घडली. या दुर्घटनेत उघड्या गटारातील गॅसमुळे गुदमरुन मेहबूब इस्माईल (१९) या कामगाराचा मृत्यू झाला असून उर्वरित चार कामगारांना उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षाकडून सांगण्यात आले.

हाजी बंदर रोड, एल अँड टी गेट नंबर १, रुपजी कानजी चाळ, शिवडी येथे खाजगी कंत्राटदाराचे पाच कामगार उघड्या गटारात पडले. बॉक्स ड्रेनचे काम सुरू असताना ही घटना घडली. यात मेहबूब इस्माईल (१९) याचा मृत्यू झाला. तर सलीम (२५) याची प्रकृती गंभीर असल्याचे केईएम रुग्णालयाकडून सांगण्यात आले. शफाकूल (२२), कोरेम (३५) व मोसलेन (३०) या तिघांची प्रकृती स्थिर असून त्यांना उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, या घटनेची चौकशी सुरू असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

कामाच्या ठिकाणी व्हीजिट होणे गरजेचे!

मुंबई महापालिकेच्या माध्यमातून विविध प्रकल्पांची कामे सुरू आहेत. जलवाहिनी टाकणे, पर्जन्य जलवाहिनी बदलणे, रस्त्यांची, नालेसफाईची अशी कामे सुरू असून काही वेळा कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे दुर्घटना घडतात. त्यामुळे ज्या-ज्या ठिकाणी कामे सुरू आहेत, अशा ठिकाणी पालिकेच्या वॉर्ड स्तरावरील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी व्हीजिट करणे गरजेचे आहे. जेणेकरुन दुर्घटना टळली जाऊ शकते, असे मत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी व्यक्त केले.

अटल पेन्शनचे केंद्रीकरण चिंताजनक; बँकांनी ग्राहकांना पेन्शन स्लॅबसाठी प्रवृत्त करावे - वित्तीय सेवा विभाग सचिव एम. नागराजू

मुंबईकरांसाठी खुशखबर! गोराईत महाराष्ट्रातील पहिल्या मँग्रोव्ह पार्कचं २८ मे रोजी उद्घाटन; पर्यावरण पर्यटनाला मिळणार चालना

Mumbai : वांद्र्यातील गरीब नगर पाडकाम ८५ टक्के पूर्ण; "मानवी दृष्टिकोन ठेवून कारवाई," पश्चिम रेल्वेचं स्पष्टीकरण

नवी मुंबईत ५०४ इमारती धोकादायक; ५२ इमारती अतिधोकादायक; विभागवार सर्वेक्षणानंतर यादी जाहीर

वाढत्या तापमानामुळे कांदा सडतोय; कांदा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त