संग्रहित छायाचित्र 
मुंबई

फक्त ४४ दिवस पुरणार पाणी! मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांत उरला केवळ 'इतका' पाणीसाठा

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांतील सध्याचा पाणीसाठा हा पुढील ४४ दिवस पुरेल इतका म्हणजेच १५ जुलैपर्यंत पुरेल इतका आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये केवळ १२.८९ इतकाच पाणी साठा शिल्लक आहे. मुंबईला या सातही तलावांमधून दररोज ४ हजार दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामुळे तलावांतील सध्याचा पाणीसाठा हा पुढील ४४ दिवस पुरेल इतका म्हणजेच १५ जुलैपर्यंत पुरेल इतका आहे.

मुंबईत २६ मे रोजी मुसळधार पाऊस झाला. असे असले तरी या पावसाने तलावांकडे पाठ फिरवली आहे. २६ मे रोजी सात तलावांपैकी केवळ तुळशी तलावात सर्वाधिक १३२ मिमी, त्यापाठोपाठ विहार तलावात ९० मिमी इतका पाऊस पडला होता. मात्र प्रमुख तलाव असलेल्या पाच तलावांपैकी फक्त मध्य वैतरणा तलावात २१ मिमी, त्यानंतर तानसा तलावात १२ मिमी, मोडक सागर तलावात ११ मिमी, भातसा तलावात ८ मिमी आणि सर्वात कमी अप्पर वैतरणा तलावात फक्त ७ मिमी इतका पाऊस पडल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली.

२ जून २०२५ रोजी सकाळपर्यंतचा शिल्लक पाणीसाठा :

गुजरातच्या सत्तेत मोठा फेरबदल; मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल वगळता संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा, उद्या नवे मंत्री शपथ घेणार

Mumbai : पूजा खेडकरच्या वडिलांना न्यायालयाचा दिलासा, ट्रक क्लिनर अपहरण प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर

Canada News : कपिल शर्माच्या ‘कॅप्स कॅफे’वर पुन्हा गोळीबार; लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली जबाबदारी, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

धक्कादायक! रशियात नोकरीचं आमिष दाखवून युक्रेनसोबतच्या युद्धात लढायला पाठवलं; "माझ्या पतीला भारतात परत आणा" - पत्नीची याचना

जिंकलंस भावा! कर्जतच्या तरुणाने मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर केली महिलेची प्रसूती; डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करून वाचवले दोन जीव