संग्रहित छायाचित्र 
मुंबई

फक्त ४४ दिवस पुरणार पाणी! मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांत उरला केवळ 'इतका' पाणीसाठा

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांतील सध्याचा पाणीसाठा हा पुढील ४४ दिवस पुरेल इतका म्हणजेच १५ जुलैपर्यंत पुरेल इतका आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये केवळ १२.८९ इतकाच पाणी साठा शिल्लक आहे. मुंबईला या सातही तलावांमधून दररोज ४ हजार दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामुळे तलावांतील सध्याचा पाणीसाठा हा पुढील ४४ दिवस पुरेल इतका म्हणजेच १५ जुलैपर्यंत पुरेल इतका आहे.

मुंबईत २६ मे रोजी मुसळधार पाऊस झाला. असे असले तरी या पावसाने तलावांकडे पाठ फिरवली आहे. २६ मे रोजी सात तलावांपैकी केवळ तुळशी तलावात सर्वाधिक १३२ मिमी, त्यापाठोपाठ विहार तलावात ९० मिमी इतका पाऊस पडला होता. मात्र प्रमुख तलाव असलेल्या पाच तलावांपैकी फक्त मध्य वैतरणा तलावात २१ मिमी, त्यानंतर तानसा तलावात १२ मिमी, मोडक सागर तलावात ११ मिमी, भातसा तलावात ८ मिमी आणि सर्वात कमी अप्पर वैतरणा तलावात फक्त ७ मिमी इतका पाऊस पडल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली.

२ जून २०२५ रोजी सकाळपर्यंतचा शिल्लक पाणीसाठा :

मुंबईसह २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा; आजपासून आचारसंहिता लागू

BMC Election : २२७ जागांसाठी मुंबईत मतदान; महापालिका निवडणुकांची अधिसूचना जाहीर

'नाव बदलणे ही लाजिरवाणी गोष्ट...'; ‘विकसित भारत’च्या नावाखाली MGNREGA च्या नावात बदल केल्याने विरोधक आक्रमक

कल्याणमध्ये रॅपिडो चालकाचा धक्कादायक प्रकार; विनयभंगाच्या प्रकरणानंतर रॅपिडो, ओला आणि उबरवर टांगती तलवार

‘वोट चोर, गद्दी छोड़’ रॅलीवरून संसदेत गोंधळ; दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब, भाजपचा तीव्र आक्षेप