संग्रहित छायाचित्र
मुंबई

काॅपीमुक्त परीक्षेसाठीसुविधा उपलब्धतेचे आदेश; शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी पूरक वातावरणावर भर

शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी काॅपीमुक्त वातावरणात परीक्षा होणे गरजेचे आहे.

Swapnil S

मुंबई : शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी काॅपीमुक्त वातावरणात परीक्षा होणे गरजेचे आहे. यासाठी शाळांमध्ये सोयीसुविधा उपलब्ध करत त्याचा आढावा घेण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांनी आठवड्यात एकदा शाळांना भेट द्या आणि वेळोवेळी अहवाल सादर करा. १० वी १२ वीच्या परीक्षा काॅपीमुक्तीसाठी यंत्रणांनी दक्ष राहावे, असे आदेश शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी शिक्षण विभागाला दिले.

शालेय शिक्षण विभागाकडील योजना, उपक्रम कार्यक्रम मिशन मोडवर राबवावेत. यामध्ये १०० दिवसांचा कार्यक्रम, नवीन शैक्षणिक धोरण व आरटीआयची प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, अशा सूचनामंत्री दादा भुसे यांनी शालेय शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत दिल्या.

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कॉपीपासून दूर राहण्यासाठी मार्गदर्शन करावे. कॉपीमुक्त परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित करावे. यासाठी आवश्यकउपाय करावेत, अशा सूचना भुसे यांनी दिल्या.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत