मुंबई

मुसळधार पावसामुळे पवई तलाव झाला ओव्हरफ्लो

पवई तलावाची क्षमता ५४५ कोटी लीटर एवढी असून या तलावाचे पाणी हे मानवाला पिण्यायोग्य नसल्याने प्रामुख्याने औद्योगिक वापरासाठी वापरले जाते.

प्रतिनिधी

जूनमध्ये दडी मारलेल्या पावसाने आता मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात दमदार बॅटिंगला सुरूवात केली आहे. पावसाच्या तुफान बॅटिंगमुळे कृत्रिम तलावांपैकी महत्त्वाचा असणारा पवई तलाव मंगळवारी सायंकाळी ६:१५ वाजताच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला आहे. दरम्यान, पवई तलावातील पाण्याचा पिण्यासाठी नाही तर औद्योगिक कामासाठी वापर करण्यात येतो, असे पालिकेच्या जल विभागातील अधिकाऱ्याने सांगितले. तसेच हा तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर या तलावाचे पाणी हे मिठी नदीला जाऊन मिळते, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. पवई तलावाची क्षमता ५४५ कोटी लीटर एवढी असून या तलावाचे पाणी हे मानवाला पिण्यायोग्य नसल्याने प्रामुख्याने औद्योगिक वापरासाठी वापरले जाते.

मुंबईत तीन दिवसांत ४८० मिमी पाऊस

बुधवारपासून पावसाने मुंबईत हजेरी लावली असून शुक्रवारी उसंती घेतल्यानंतर सोमवारी सायंकाळनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. मंगळवारी दिवसभरात पावसाने मुंबईत जोरदार बॅटिंग केली. गेल्या तीन दिवसांत मुंबईत तब्बल ४८० मिमी पावसाची नोंद झाल्याचे पालिकेचे आयुक्त डॉ. इकबाल सिंग चहल यांनी सांगितले.

Gurugram Hit-and-Run : महिला बाईक रायडरला कारची जोरदार धडक; फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद

Mumbai : मेट्रो ९ टप्पा २ साठी विशेष वाहतूक ब्लॉक; १५ ते २५ सप्टेंबर दरम्यान सकाळी वाहतूक उशीरा सुरू होणार

Jio-Airtel चा Vi ला दणका; मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीवरून TRAI कडून चौकशी सुरू, नेमकं प्रकरण काय?

Mumbai : दादर पूर्व स्टेशन परिसर होणार कोंडीमुक्त; टॅक्सी, बेस्टसाठी स्वतंत्र मार्गीका, टॅक्सी स्टँड

परिचारिकांना महिन्याला आठ सुट्या द्या; राज्य शासनाच्या धर्तीवर ४० तासांचा आठवडा करा, परिचारिका संघटनेने BMC चे लक्ष वेधले