मुंबई

रेल्वे कर्मचाऱ्यांवर अत्यावश्यक सेवा कायद्यांतर्गत कारवाई करा! प्रवासी संघटनांची मागणी

रेल्वे कर्मचाऱ्यांनी ऐन गर्दीच्या वेळी गुरुवारी पुकारलेल्या संपावर प्रवासी संघटनांनी जोरदार टीका केली आहे. रेल्वे प्रवाशांचा संप ‘बेकायदेशीर’ असून त्यांच्यावर अत्यावश्यक सेवा कायदाअंतर्गत कठोर कारवाई करावी.

Swapnil S

कमल मिश्रा आणि मेघा कुचिक/मुंबई

रेल्वे कर्मचाऱ्यांनी ऐन गर्दीच्या वेळी गुरुवारी पुकारलेल्या संपावर प्रवासी संघटनांनी जोरदार टीका केली आहे. रेल्वे प्रवाशांचा संप ‘बेकायदेशीर’ असून त्यांच्यावर अत्यावश्यक सेवा कायदाअंतर्गत कठोर कारवाई करावी. मुंब्रा दुर्घटना आणि गुरुवारच्या रेल्वे अपघाताची पारदर्शक चौकशी करून लोकल वाहतूक ठप्प करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रवासी संघटनांनी केली आहे.

मुंबई रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष मधु कोटियन यांनी रेल्वे कामगार संघटनेच्या आंदोलनावर तीव्र टीका करत हे आंदोलन ‘बेकायदेशीर आणि बेजबाबदार’ असल्याचे म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, ‘रेल्वे युनियनचे आंदोलन बेकायदेशीर होते. त्यांनी स्थानिक गाड्या तासन्‌तास थांबवल्या. या आंदोलनकर्त्यांवर ‘एस्मा’ लागू करायला हवा. प्रवाशांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसतानाही रेल्वे कामगार संघटनेने त्यांच्यावर अन्याय केला. रेल्वे कर्मचाऱ्यांशी संबंधित काही घडले की कामगार संघटना लगेच प्रतिक्रिया देते. पण त्यांनी प्रवाशांना का लक्ष्य केले?’ असा सवाल त्यांनी केला.

‘प्रवाशांच्या सुरक्षेकडे रेल्वे प्रशासन वारंवार दुर्लक्ष करते. प्रत्येक वेळी अपघात झाला की वरिष्ठ अधिकाऱ्यांचीच समिती तयार केली जाते. त्यांच्या अहवालांवर कोणी प्रश्न उपस्थित करत नाही आणि ते नेहमी आपल्या कामगारांना पाठीशी घालतात’, असा आरोप त्यांनी केला.

उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघाच्या सचिव लता अरगडे यांनीही आंदोलनकर्त्यांवर कायदेशीर कारवाईची मागणी केली. ‘आमच्या संघटनेने विभागीय रेल्वे व्यवस्थापक आणि महाव्यवस्थापकांची भेट घेतली असून, आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मुंब्रा घटनेबाबतच्या प्राथमिक चौकशीत बरेच काही समोर येऊ शकते. अभियंते जबाबदार होते आणि सहकार्य करण्याऐवजी त्यांनी आंदोलन सुरू केले,’ असे त्यांनी सांगितले.

मुंबई रेल्वे दुर्घटनेची चौकशी निवृत्त न्यायाधीशांकडून करावी आणि अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना नोकरी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

Mumbai : भाजप व शिंदे सेनेची मदार दादांच्या तीन नगरसेवकांवर; दोन्ही पक्षनेतृत्वाकडून मोर्चेबांधणी

आरसीएफ वायू गळतीबद्दल वृत्तपत्रे, न्यायिक अधिकारी खोटे बोलतात का? हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारले

BMC चा दणका! १,१८९ बांधकामांना कामबंद नोटीस; सेन्सर्स न बसवणे पडले महागात

मुंबई, नवी मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी उच्चाधिकार समिती; पालिकांच्या कारभारावर हायकोर्टाची तीव्र नाराजी

NCP च्या दोन गटांत रस्सीखेच! सुनेत्रा पवारांना मंत्रिमंडळात घेण्याची राष्ट्रवादीची मागणी; तर विलिनीकरणासाठी शरद पवार गट आग्रही