मुंबई

डिजिटल कर्ज देणाऱ्या बँकाना आरबीआयने दिले हे महत्त्वाचे निर्देश

आरबीआयकडे रिकव्हरी एजंट पैसे मिळवण्यासाठी कर्जदारांना त्रास देत असल्याच्या तक्रारी येत होत्या, त्यावर घेतला मोठा निर्णय

प्रतिनिधी

भारतीय रिझर्व्ह बँकेने डिजिटल कर्ज देणाऱ्या कंपन्यांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. डिजिटल कर्ज देणाऱ्या बँकांकडून कर्जवसुली करण्यासाठी ज्या रिकव्हरी एजंट नेमणूक केली जाईल. त्यांची संपूर्ण माहिती कर्जदाराला देणे आवश्यक असल्याचे निर्देश आरबीआयने दिले आहेत. कर्जवसुली संबंधित अनेक तक्रारी आल्यानंतर आरबीआयने हा निर्णय घेतला. यासंबंधित त्यांनी नियमावली जाहीर केली आहे.

आरबीआयने डिजिटल कर्जासंबंधिच्या मार्गदर्शक तत्त्वांसंदर्भात एक माहिती जाहीर केली आहे. यामध्ये त्यांनी म्हंटले आहे की, कर्ज थकीत झाल्यास व कर्जदाराकडून वसूल करण्यासाठी रिकव्हरी एजंटची नियुक्ती केली असल्यास, डिजिटल कर्ज देणाऱ्या कंपन्यांनी वसुली एजंटशी संपर्क साधण्याआधी त्यांचा फोन नंबरपासून सर्व माहिती द्यावी. वसुली एजंटची सर्व माहिती ही ईमेल आणि एसएसएसद्वारे कर्जदारांना देण्यात यावी. डिजिटल कर्ज देणाऱ्या बँकांनी नियुक्त केलेल्या अधिकृत वसुली एजंटचे नाव कर्जदारांना देण्यात येईल. या कर्जाची परतफेड न झाल्यास संबंधित वसुली एजंट ग्राहकांशी संपर्क साधतील अशी माहिती कर्जदाराना आधीच दिली पाहिजे.

१० एप्रिलपासून टोलवर कॅश बंद! FASTag-यूपीआय अनिवार्य; काय आहेत नवे नियम? जाणून घ्या

Mumbai : चर्चगेट मेट्रो स्थानकाचे A4 गेट तात्पुरते बंद; कधी होणार सुरू? जाणून घ्या वेळ

Thane : अंधश्रद्धेचा गैरफायदा! 'काळ्या जादूचा प्रभाव दूर करतो' म्हणत कुटुंबाला १.६६ कोटींचा गंडा

ठाणे महापालिकेचा महसूल १,९०९ कोटींवर; करवसुलीत आघाडी कायम

ठाण्यात घर खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी; १७ एप्रिलपासून MCHIचे प्रॉपर्टी प्रदर्शन