मुंबई

म्हाडाच्या मास्टर लिस्टमधील रहिवाशांची घरांकडे पाठ; केवळ ३२ पात्र रहिवाशांनी घेतले घर

म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या बृहतसूची (मास्टर लिस्ट) लॉटरीतील पात्र रहिवाशांनी हक्काचे घर घेण्याकडे पाठ फिरवली आहे.

Swapnil S

तेजस वाघमारे / मुंबई

म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या बृहतसूची (मास्टर लिस्ट) लॉटरीतील पात्र रहिवाशांनी हक्काचे घर घेण्याकडे पाठ फिरवली आहे. २६५ पात्र विजेत्यांपैकी केवळ ३२ रहिवाशांनी हक्काचे घर आजवर ताब्यात घेतले आहे. त्यामुळे मंडळाने पात्र मूळ भाडेकरू/रहिवाशी लाभार्थ्यांच्या निकटच्या वारसांना सदनिकेचा सशर्त ताबा देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. त्यानुसार मंडळाने रहिवाशांना नोटीस बजावत १० दिवसांत कागदपत्रे सादर करण्याची मुदत दिली आहे. त्यानुसार रहिवाशांचा मास्टर लिस्टमधील हक्क कायमचा संपुष्टात येईल, असा इशारा मंडळाने दिला आहे.

बृहत‌्सूचीवरील जुन्या उपकरप्राप्त इमारतींतील २६५ पात्र भाडेकरू-रहिवाशांना सदनिका वाटप करण्यासाठी म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे २८ डिसेंबर २०२३ रोजी  संगणकीय लॉटरी काढण्यात आली. यानंतर रहिवाशांना देकारपत्र वितरित करण्यात आले. त्यानुसार आजवर ३२ रहिवाशांनी हक्काच्या घराचा ताबा घेतला आहे. मात्र अनेक प्रकरणांमध्ये मूळ भाडेकरू किंवा रहिवाश्यांचे निधन झाले असल्याचे मंडळाच्या निदर्शनास आले आहे. मूळ भाडेकरू/रहिवाशी यांची पत्नी/मुले असे एकापेक्षा जास्त वारस असल्यामुळे सक्षम न्यायालयाचे वारस प्रमाणपत्र मिळवण्यासाठी वारसांना सहा ते नऊ महिन्यांचा कालावधी लागतो, ज्यामुळे घराचे वितरण करण्यास विलंब होत आहे.

त्यामुळे मंडळाने मूळ भाडेकरू किंवा निकटचे वारस (मुलगा, मुलगी, आई-वडील किंवा पत्नी) असल्यास, इतर नातेवाईकांचे "ना हरकत प्रमाणपत्र" प्राप्त करवून सदनिकेचा सशर्त ताबा देण्याची कारवाई सुरू केली आहे.

रहिवाशांना घराचा ताबा घेण्यास मुदत

पात्र रहिवाशांनी मंडळाकडे घराचा ताबा घेण्याबाबत अर्ज केला आहे. मुलांच्या शाळा असल्याने सध्या संक्रमण शिबिरातील घर सोडू शकणार नसल्याची विनंती रहिवाशांनी केली आहे. सहानुभूतीचा विचार करून मंडळाने अनेक रहिवाशांना घराचा ताबा देण्यास काही दिवसांची मुदत दिली असल्याचे मंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

औद्योगिक जमिनींसाठी GST सारखी स्वतंत्र परिषद हवी; नियमात सुसूत्रता आणण्यासाठी 'सीआयआय'ची शिफारस

जम्मू-काश्मीर बस अपघात: उधमपूरमध्ये बस दरीत कोसळून १५ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी

उत्तर कोरियाकडून समुद्राच्या दिशेने क्षेपणास्त्रांची चाचणी; आशियाई देशांमध्ये तणाव

मोदींकडून सरकारी यंत्रणेचा गैरवापर; ममता बॅनर्जी यांचा गंभीर आरोप

परतवाडा प्रकरणात होणार मोठा पर्दाफाश? आरोपींच्या ५ पैकी ३ मोबाईलचा डेटा रिकव्हर करण्यात पोलिसांना यश