मुंबई

श्रीराम मंदिर ते रेवस बंदर रस्त्याचे काम लवकरच होणार पूर्ण

एआयपीएचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी आपल्या निवेदनात या रस्त्याचे महत्व स्पष्ट केले आहे.

वृत्तसंस्था

श्रीराम मंदिर ते रेवस बंदर (ता. अलिबाग) रस्त्याचे बरेच महिने रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट मेरीटाईम बोर्डाचे (एमएमबी) मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सैनी यांनी दिली.

ऑल इंडिया पॅसेंजर्स असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नुकतीच अमित सैनी यांची भेट घेऊन अपूर्णावस्थेत असलेला हा रस्ता लवकरात लवकर उभारण्याबाबत त्यांना लेखी निवेदनाद्वारे आग्रही विनंती केली हा जिव्हाळ्याचा प्रश्न लवकर मार्गी लागावा यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सैनी यांनी सबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले. एआयपीएचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी आपल्या निवेदनात या रस्त्याचे महत्व स्पष्ट केले आहे.

हा रस्ता तयार झारल्यानंतर एस. टी.सेवा पुर्वव्रत होईल व प्रवाशांचा आर्थिक भार कमी होईल. तसेच नवीन रस्ता क्रॉक्रीटचा होणार आहे. एम एम बी मार्फत यासाठी सुमारे ३ कोटींहून अधिक निधी खर्च करण्यात येत आहे. याबद्दल शेवटी एआयपीएचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी एमएमबी ला धन्यवाद दिले

ओला दुष्काळ जाहीर करण्यास मुख्यमंत्री फडणवीसांचा नकार; पण सर्व सवलती लागू, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन

"२६/११ नंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देणार होतो, पण...; पी. चिदंबरम यांचा गौप्यस्फोट

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले! क्वेट्टामध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट, १० ठार, भयानक व्हिडिओ समोर

Dombivali : झोपेतच सर्पदंश! ३ वर्षांच्या चिमुकलीसह मावशीचा मृत्यू; KDMC रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत