मुंबई

पश्चिम रेल्वेकडून १२१ गुन्हेगारांची धरपकड

'ऑपरेशन पॅसेंजर सिक्युरिटी' मोहिमेला प्राधान्य देत गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ३९१२ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. यात अंगभूत चेहऱ्याची ओळख प्रणाली सहसुसज्ज ४८८ कॅमेरे आहेत.

Swapnil S

मुंबई : प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करुन देणाऱ्या पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. रेल्वे परिसरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या आरपीएफने 'ऑपरेशन पॅसेंजर सिक्युरिटी' मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत १२१ हून अधिक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार प्रवाशांच्या सामानाच्या चोरीच्या समस्येला आळा घालण्यासाठी आरपीएफने विशेष प्रयत्न केले आहेत. 'ऑपरेशन पॅसेंजर सिक्युरिटी' मोहिमेला प्राधान्य देत गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ३९१२ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. यात अंगभूत चेहऱ्याची ओळख प्रणाली सहसुसज्ज ४८८ कॅमेरे आहेत. यात गुन्हेगारांच्या तपशीलांसह त्यांच्या छायाचित्रांचा समावेश आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी २०२४ मध्ये, पश्चिम रेल्वेच्या आरपीएफनेने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने १२१ आरोपींना पकडले आहे आणि सुमारे ४४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

गुन्हे प्रतिबंध आणि शोध पथकाने सीसीटीव्ही फुटेजद्वारे निरीक्षण करून अंधेरी स्टेशनवर एका चोराला पकडले. चौकशीदरम्यान संशयित विनोद प्रेमचंद गुप्ता (३८) मोबाईल चोरीच्या वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे उघड केले. अंधेरी स्थानकात वेगवेगळ्या तारखांना चोरीच्या या घटना घडल्या. आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी जीआरपी अंधेरीकडे सोपवण्यात आले. आरोपींनी अंदाजे ९० हजार रुपये किमतीचे मोबाईल चोरले होते. त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम ३७९ अन्वये चोरीचे चार गुन्हे दाखल आहेत.

सतर्क आणि सतर्क आरपीएफ अधिकाऱ्यांना चोरी, दरोडा यासारख्या प्रवासी संबंधित अनेक गुन्ह्यांमध्ये गुन्हेगारांना जेरबंद केले असून प्रवाशांचे मोबाईल फोन, रोख रक्कमेने भरलेली बॅग, मौल्यवान वस्तू, महत्त्वाची कागदपत्रे, पर्स आदी वस्तू जप्त करण्यात यश आल्याचे सुमित ठाकूर म्हणाले.

बांधकाम प्रकल्पांमुळे ठाण्याची हवा प्रदूषित; २८ ठिकाणी नियमभंग, ५.२५ लाखांचा दंड

जाधवजी मॅन्शन बहुमजली इमारतीवर टांगती तलवार; निर्धारित उंचीपेक्षा उभारलेले वरचे मजले पाडावे लागतील, हायकोर्टाचा इशारा

नळाला पाणी नाही, पण बिल वाढले! पहिल्याच महासभेत उल्हासनगरकरांना पाणीपट्टीचा झटका

Mumbai : रुळांवर पाणी भरण्यापासून मुक्तता; पंपिंग स्टेशन उभारणीच्या कामाला वेग; कुर्ला-सायन रेल्वे स्थानकादरम्यान प्रवाशांना दिलासा

तात्पुरत्या स्वरूपात कामावर ठेवलेला चालक 'कर्मचारी'च; मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल