मुंबई

Sanjay Raut : "भाजपकडून मैत्रीचा हात आला तर..."; काय म्हणाले संजय राऊत?

काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना माफ केल्याचे विधान केले होते, त्यानंतर चर्चांना उधाण आले होते

प्रतिनिधी

काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना माफ केल्याचे विधान केले होते. यावरून राजकीय चर्चांना उधाण आले होते. यासंदर्भात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना, 'भाजपकडून जर मैत्रीचा हात आला तर तो स्वीकारणार का?' असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी परखडपणे उत्तर दिले की, "भाजपबरोबर अजिबात हातमिळवणी करणार नाही. हे मी स्पष्टपणे सांगत आहे." याचसोबत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, "राजकारणामध्ये मतभेद होत राहतात, काही वेळेला तर टोकाचे मतभेदही होतात. यापूर्वीही अनेक पक्षांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. भूतकाळात आमचेही अनेकदा मतभेद झाले आहेत. पण तुम्ही बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेला पक्ष फोडता आणि चोर, लफंगांच्या हातावर हात ठेवता, कोण तुम्हाला माफ करेल?" असा सवाल त्यांनी केला. मनसेच्या वर्धापनदिनानिमित्त ते बोलले की, "या महाराष्ट्रात प्रमुख पदावर काम करणारे सगळेच लोक हे शिवसेनेतच होते. शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे नसते, तर आपण कुठे असतो याची उजळणी आणि आत्मचिंतन प्रत्येकाने करायला हवे," असे म्हणत त्यांनी टोला लगावला.

शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी! आता दरवर्षी ५० तासांचे प्रशिक्षण अनिवार्य; शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

मोरा-मुंबई रो-रो सेवेचा एप्रिलचा मुहूर्त पुन्हा हुकला; ७५ कोटी रुपयांचा प्रकल्प रखडलेल्या स्थितीत

खड्डा चुकवताना रिक्षा थेट नदीत कोसळली; पेण-खोपोली मार्गावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू, एक जखमी

देवस्थानांकडचे मोठे भूखंड होणार खुले; इनामी जमीन रद्द करण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव

मोठी बातमी! सुधारित पेन्शन योजना आता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ऐच्छिक; शासनाकडून नवीन परिपत्रक जारी