मुंबई

मुंबईतील सर्व कार प्रवाशांना सीट बेल्ट बंधनकारक; चालक आणि सह प्रवाशांसाठी सीट बेल्ट

ज्या वाहनांकडे सीट बेल्टची सुविधा नाही, त्यांनी सर्व प्रवाशांसाठी सीट बेल्ट लावणे आवश्यक असल्याचे मुंबई पोलिसांनी यापूर्वी सांगितले होते. यासाठी १ नोव्हेंबर ही अंतिम तारीखही निश्चित करण्यात आली होती.

प्रतिनिधी

कारमधून प्रवास करणार्‍या सर्व प्रवाशांना १ नोव्हेंबर २०२२पासून सीट बेल्ट घालणे अनिवार्य केले आहे. १४ ऑक्टोबर २०२२ रोजी मुंबई पोलिसांनी एक अधिसूचना जारी केली होती की १ नोव्हेंबरपासून चालक आणि सहप्रवाशांना सीट बेल्ट घालणे अनिवार्य असेल. त्या अधिसूचनेत, मुंबई पोलिसांनी म्हटले होते की जो कोणी सुरक्षा बेल्ट न लावता मोटार वाहन चालवतो किंवा सीट बेल्ट न लावलेल्या प्रवाशांना घेऊन जातो त्या चालकाला दंड आकारण्यात येईल.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई वाहतूक पोलीस सीट बेल्ट जनजागृती मोहीम सुरू करणार आहे जी १० दिवस चालेल, त्यानंतर कारवाई केली जाईल.ते असं देखील म्हणाले कि, “११ नोव्हेंबरपासून जे प्रवासी कारमध्ये सीट बेल्टशिवाय बसलेले आढळतील अगदी मागील सीटवरही, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल".

ज्या मोटार वाहनांकडे सीट बेल्टची सुविधा नाही त्यांनी सर्व प्रवाशांसाठी सीट बेल्ट लावणे आवश्यक असल्याचे मुंबई पोलिसांनी यापूर्वी सांगितले होते. यासाठी १ नोव्हेंबर २०२२ ही अंतिम तारीखही निश्चित करण्यात आली होती.

मुंबईच्या आधी, सप्टेंबरमध्ये, रस्ता सुरक्षा नियम तीव्र करण्याच्या प्रयत्नात, दिल्ली वाहतूक पोलिसांनी लोकांना मागील सीट बेल्ट वापरण्यास प्रोत्साहित करण्यासाठी एक विशेष मोहीम देखील सुरू केली होती, ज्यामध्ये अयशस्वी झाल्यास त्यांना ₹१,००० च्या दंडाला सामोरे जावे लागेल.

"सर्व मोटार वाहन चालक आणि वाहनातील सर्व प्रवासी, मुंबई शहराच्या रस्त्यावरून प्रवास करणार्‍या सर्व प्रवाशांना याद्वारे कळविण्यात येते की, ०१/११/२०२२ पासून प्रवास करताना चालक आणि सर्व प्रवाशांनी सीट बेल्ट लावणे बंधनकारक असेल. अन्यथा मोटार वाहन (सुधारणा) कायदा २०१९च्या कलम १९४(B)(1) अंतर्गत कारवाई केली जाईल."

वाहतूकदारांचा राज्यव्यापी संप; बस-टॅक्सी सेवा ठप्प, शालेय विद्यार्थ्यांसह सर्वसामान्यांवर काय परिणाम?

Mumbai : India vs England सामन्यामुळे मरीन ड्राइव्ह परिसरात ट्रॅफिक अलर्ट; वाहतूक पोलिसांकडून पर्यायी मार्ग जाहीर, वाचा सविस्तर

Iran vs US-Israel War : मध्यपूर्वेतील संघर्षात वाढ; भारतीय नागरिकांसाठी परराष्ट्र मंत्रालयाकडून हेल्पलाइन क्रमांक जारी

Mumbai : वानखेडेवर India vs England सेमीफायनल; चाहत्यांसाठी मेट्रोच्या अतिरिक्त फेऱ्या, पाहा वेळापत्रक

दारूच्या वादातून वडिलांची कुऱ्हाडीने हत्या; म्हणाला "चुकून झालं", मृतदेह पाण्याच्या टाकीत टाकून बाहेर जाऊन खाल्ली बिर्याणी