मुंबई

पहिल्या पावसाच्या सरींनी मुंबईकर झाले गारेगार

प्रतिनिधी

मुंबईसह ठाणे परिसरात गुरुवारी सकाळपासूनच प्रचंड उष्मा जाणवत होता. अंगातून घामाच्या धारा वाहत होता. असह्य उकाड्याने मुंबईकर, ठाणेकर अक्षरश: हैराण झाले होते. हीच चाहूल होती पावसाची. अखेर गुरुवारी सायंकाळी मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याणमध्ये वर्दी देत पावसाने सर्वांना खूश करून टाकले.

उन्हाळा संपल्यावर पाऊस कधी सुरू होणार याचीच वाट सर्वजण पाहत असतात. यंदाचा उन्हाळा भीषण होता. हवामान खात्याने यंदा लवकर पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केला; पण पाऊस पडण्याची चिन्हे दिसत नसल्याने सर्वांच्याच तोंडचे पाणी पळाले. गुरुवारी सायंकाळी वांद्रे, खार, सांताक्रूझ येथे मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला. वातावरणात गारवा पसरला. येत्या ११ जूनपासून मुंबईत मान्सूनला सुरुवात होणार आहे. गुरुवारी सांताक्रूझला किमान २९.५ अंश तर कमाल ३४.९ अंश तापमान नोंदवले गेले. कुलाबा येथे किमान २६.४ अंश व कमाल ३४.६ अंश तापमान नोंदवले गेले.

... तर तुम्हाला नक्कीच सुवर्णपदक मिळेल; फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ पोस्ट करत रोहित पवारांचा टोला

अमित शहांच्या भाषणाचा एडिट केलेला व्हिडिओ व्हायरल, FIR दाखल

विनातिकिट प्रवास हा गुन्हाच- हायकोर्ट; उच्चपदस्थ अधिकाऱ्याला तूर्तास दिलासा

माढ्यात फडणवीसांनीही टाकला डाव; अभिजित पाटील, धवलसिंह भाजपच्या गळाला?

दक्षिण भारतात पाण्याची भीषण टंचाई, केवळ १७ टक्के जलसाठा; महाराष्ट्र, गुजरातमध्येही परिस्थिती भीषण