मुंबई

‘देशाचे मीठ’ महाग होणार; टाटा कंपनी मीठाच्या किमती वाढवणार

वाढत्या महागाईचा कंपनीच्या नफ्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे टाटा ग्राहक उत्पादनांनी किमती वाढवण्याचा निर्णय घेतला

प्रतिनिधी

दूधापासून भाज्यांपर्यंत प्रत्येक गोष्ट महाग होत आहे. आतापर्यंत मीठ त्यातून सुटले होते. आता टाटा कंपनीने आपल्या मीठाच्या किमती वाढवण्याचे सूतोवाच केले आहे. महागाईचा फटका कंपनीला बसत आहे. त्यामुळे मीठाची किंमत वाढवणे अपरिहार्य आहे, असे कंपनीचे सीईओ सुनील डिसुझा यांनी सांगितले. टाटाच्या एक किलो मिठाची किंमत २८ रुपये आहे. वाढत्या महागाईचा कंपनीच्या नफ्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे टाटा ग्राहक उत्पादनांनी किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, मिठाची किंमत कधी वाढणार याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. कंपनीचे सीईओ म्हणाले, आम्ही योग्य नफा ठरवण्यासाठी मिठाच्या किमतीत वाढ करण्याच्या प्रक्रियेत आहोत. मिठावर सतत वाढत्या महागाईचा दबाव असतो. मिठाच्या किमती वाढविण्यात ब्राईन आणि ऊर्जा हे दोन घटक महत्वाचे असतात. गेल्या वर्षी ब्राइनची किंमत वाढली होती. तर ऊर्जेची किंमत खूप जास्त आहे. त्यामुळेच मीठ व्यवसायाच्या नफ्यावर दबाव दिसून येत आहे.

BMC Election : आज मतदान; मुंबईच केंद्रस्थानी; बोटावर उमटणार लोकशाहीचा ठसा, तरुणाईमध्ये उत्साहाचे वातावरण

"मतदानानंतर बोटावरची शाई पुसणे हा..."; राज्य निवडणूक आयोगाचा इशारा, मार्कर पेनबाबतही दिले स्पष्टीकरण

मतदानानंतर लगेच पुसली जाते बोटावरची शाई; मनसेच्या महिला उमेदवाराचा दावा; काँग्रेसच्या सचिन सावंतांनी तर प्रात्यक्षिकच दाखवलं - Video

BMC Elections 2026: 'व्होटर स्लिप्स'चा गोंधळ; अनेक मतदार मतदान न करताच परतले

Thane Election : व्होटर स्लिपमध्ये घोळ; नाव, अनुक्रमांक बरोबर; पत्ते मात्र बदलले