मुंबई

‘देशाचे मीठ’ महाग होणार; टाटा कंपनी मीठाच्या किमती वाढवणार

प्रतिनिधी

दूधापासून भाज्यांपर्यंत प्रत्येक गोष्ट महाग होत आहे. आतापर्यंत मीठ त्यातून सुटले होते. आता टाटा कंपनीने आपल्या मीठाच्या किमती वाढवण्याचे सूतोवाच केले आहे. महागाईचा फटका कंपनीला बसत आहे. त्यामुळे मीठाची किंमत वाढवणे अपरिहार्य आहे, असे कंपनीचे सीईओ सुनील डिसुझा यांनी सांगितले. टाटाच्या एक किलो मिठाची किंमत २८ रुपये आहे. वाढत्या महागाईचा कंपनीच्या नफ्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे टाटा ग्राहक उत्पादनांनी किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, मिठाची किंमत कधी वाढणार याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. कंपनीचे सीईओ म्हणाले, आम्ही योग्य नफा ठरवण्यासाठी मिठाच्या किमतीत वाढ करण्याच्या प्रक्रियेत आहोत. मिठावर सतत वाढत्या महागाईचा दबाव असतो. मिठाच्या किमती वाढविण्यात ब्राईन आणि ऊर्जा हे दोन घटक महत्वाचे असतात. गेल्या वर्षी ब्राइनची किंमत वाढली होती. तर ऊर्जेची किंमत खूप जास्त आहे. त्यामुळेच मीठ व्यवसायाच्या नफ्यावर दबाव दिसून येत आहे.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त