मुंबई

‘देशाचे मीठ’ महाग होणार; टाटा कंपनी मीठाच्या किमती वाढवणार

वाढत्या महागाईचा कंपनीच्या नफ्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे टाटा ग्राहक उत्पादनांनी किमती वाढवण्याचा निर्णय घेतला

प्रतिनिधी

दूधापासून भाज्यांपर्यंत प्रत्येक गोष्ट महाग होत आहे. आतापर्यंत मीठ त्यातून सुटले होते. आता टाटा कंपनीने आपल्या मीठाच्या किमती वाढवण्याचे सूतोवाच केले आहे. महागाईचा फटका कंपनीला बसत आहे. त्यामुळे मीठाची किंमत वाढवणे अपरिहार्य आहे, असे कंपनीचे सीईओ सुनील डिसुझा यांनी सांगितले. टाटाच्या एक किलो मिठाची किंमत २८ रुपये आहे. वाढत्या महागाईचा कंपनीच्या नफ्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे टाटा ग्राहक उत्पादनांनी किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, मिठाची किंमत कधी वाढणार याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. कंपनीचे सीईओ म्हणाले, आम्ही योग्य नफा ठरवण्यासाठी मिठाच्या किमतीत वाढ करण्याच्या प्रक्रियेत आहोत. मिठावर सतत वाढत्या महागाईचा दबाव असतो. मिठाच्या किमती वाढविण्यात ब्राईन आणि ऊर्जा हे दोन घटक महत्वाचे असतात. गेल्या वर्षी ब्राइनची किंमत वाढली होती. तर ऊर्जेची किंमत खूप जास्त आहे. त्यामुळेच मीठ व्यवसायाच्या नफ्यावर दबाव दिसून येत आहे.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत