मुंबई

मंडप परवानगीसाठीच्या अटी-शर्ती मागे; पाच वर्षे कालावधीबाबत मंडळांना दिलासा

मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारणीसाठी पाच वर्षे कालावधीची परवानगी एकदाच देण्याच्या प्रक्रियेतील अटी - शर्ती शुक्रवारी रद्द करण्यात आल्या. त्यामुळे बहुसंख्य मंडळांना दिलासा मिळाला आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारणीसाठी पाच वर्षे कालावधीची परवानगी एकदाच देण्याच्या प्रक्रियेतील अटी - शर्ती शुक्रवारी रद्द करण्यात आल्या. त्यामुळे बहुसंख्य मंडळांना दिलासा मिळाला आहे.

बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बुधवारी सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत समितीने बाजू मांडली होती. त्यावेळी शिंदे यांनी जाचक अटी शर्ती मागे घेऊन सुधारित परिपत्रक काढण्याचा आदेश प्रशासनाला दिला होता. त्यानुसार शुक्रवारी मुंबई महापालिकेने सुधारित परिपत्रक जारी केले. गणेश मंडळांना पाच वर्षांसाठी एकदाच परवानगी देताना त्यांच्याकडून स्वयंघोषणापत्र मागण्यात येऊ नये. कोणत्याही अटी शर्तीविना ही परवानगी देण्यात यावी. (गेल्या दहा वर्षांत कोणत्याही नियमाचा किंवा कायद्याचा भंग केलेला नाही, याबाबत हे स्वयंघोषणापत्र होते. त्यामुळे बहुसंख्य मंडळांपुढे अडचणी निर्माण झाल्या होत्या.) आता अशा घोषणापत्रासाठी मंडळांना झालेला खर्च परत मिळावी, यासाठी समिती प्रयत्न करणार आहे, असे समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी म्हटले आहे.

CBSE चा मोठा निर्णय! दहावीच्या विद्यार्थ्यांना त्रिभाषा धोरणातून सूट; नववीतील विद्यार्थ्यांसाठीही नवे नियम

नसरापूर अत्याचार प्रकरण : आरोपी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा; पुणे सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय

नसरापूर निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "अशा नराधमांना...

श्रद्धा कपूरच्या 'ईठा'वर नारायणगावकर कुटुंबीयांची नाराजी; चित्रपटाचे नाव बदलण्याची मागणी

राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी बंधनकारक; नियम मोडल्यास १ लाखांचा दंड, मान्यताही रद्द