मुंबई

गोरेगाव-विक्रोळीतील अपघातात दोन बाईकस्वारांचा मृत्यू

ठाण्याहून घाटकोपरच्या दिशेने जाताना विक्रोळीतील पूर्व दुतग्रती मार्गावरील टाटा पॉवर कार्यालयाजवळ त्याच्या बाईकला अपघात झाला

Swapnil S

मुंबई : गोरेगाव आणि विक्रोळीतील दोन वेगवेगळ्या अपघातात दोन बाईकस्वारांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये नवनाथ विठ्ठल गावडे (५०) आणि सुरेश गुप्ता (४७) यांचा समावेश आहे. याप्रकरणी आरे आणि विक्रोळी पोलिसांनी दोन स्वतंत्र अपघाताची नोंद करून तपास सुरू केला आहे. नवनाथ ठाण्याच्या शिवाजीनगर परिसरात राहत असून, घाटकोपरच्या एका खासगी कंपनीत कामाला होता. मंगळवारी तो त्याच्या बाईकवरून कामावर जात होता.

ठाण्याहून घाटकोपरच्या दिशेने जाताना विक्रोळीतील पूर्व दुतग्रती मार्गावरील टाटा पॉवर कार्यालयाजवळ त्याच्या बाईकला अपघात झाला होता. त्याला विक्रोळी पोलिसांनी राजावाडी रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. प्राथमिक तपासात नवनाथची बाईक स्लीप होऊन डिवायडरला धडकली. त्यात त्याचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. त्यामुळे त्याच्याविरुद्ध पोलिसांनी हलगर्जीपणाने बाईक चालवून स्वत:च्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. दुसरा अपघात सोमवारी दुपारी एक वाजता अंधेरीतील जेव्हीएलआर रोड, अदानी इलेक्ट्रीकसिटी बसस्टॉपजवळील पेट्रोलपंपासमोर झाला. सुरेश गुप्ता हा मालाडच्या मार्वे रोड, राठोड व्हिलेजमध्ये त्याच्या कुटुंबीयांसोबत राहत असून, त्याचे किराणा मालाचे एक दुकान आहे. सोमवारी त्याच्या बाईकवरून मालाडच्या दिशेने येत होते. भरवेगात जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात त्यांच्या बाईकला धडक दिली होती.

या अपघातात सुरेशसह त्याची मुलगी दिपाली ही जखमी झाली होती. जखमी झालेल्या दोघांनाही अंधेरीतील कामगार व नंतर कूपर रुग्णालयात दाखल केले. तिथे सुरेशला सायंकाळी सव्वाचार वाजता उपचारादरम्यान मृत घोषित करण्यात आले, तर दिपालीला प्राथमिक औषधोपचारानंतर सोडून देण्यात आले. याप्रकरणी त्याची पत्नी बिंदो गुप्ता यांच्या तक्रारीवरुन आरे पोलिसांनी आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

Mumbai : चार हॉटेल्सवर एफडीएची कारवाई; कॅफे मोंडेगर, महाराष्ट्र बिर्याणी सेंटरचे परवाने निलंबित

PMLA प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; ED कडून प्रकरणांचा तपशील मागवला

ठाण्यात आस्थापनांची परवाना नूतनीकरणाकडे पाठ; परवाना विभागाकडून मागील १८ महिन्यांत १,१८२ नोटिसा, अवघ्या ४३४ चे नूतनीकरण

साखर कारखान्यांना ७३८ कोटींचे व्याज अनुदान; सहकारी साखर कारखान्यांसाठी सुलभ कर्ज योजना, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

Mumbai : शंख-शिंपल्यांपासून साकारली ९.५ फुटांची इको-फ्रेंडली गणेशमूर्ती; मालाडच्या श्री साई दर्शन मित्रमंडळाचे १७ व्या वर्षात पदार्पण