संग्रहित छायाचित्र  
मुंबई

BMC च्या कामात आधी कंत्राटदार ठरतो; वर्षा गायकवाड यांची टीका

मुंबई महापालिका ही भ्रष्टाचाराचे कुरण बनली असून सत्ताधारी नेते, अधिकारी आणि कंत्राटदार संगनमताने मुंबईकरांच्या पैशांवर दरोडा टाकत आहेत. नगरविकास खात्यातील टेंडर आधीच ठरलेल्या कंत्राटदारांना मिळत असून महायुती सरकार मुंबईकरांचे जीवन त्रस्त करत असल्याचे आरोप मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केले.

Swapnil S

मुंबई : मुंबई महानगरपालिका भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे. सत्ताधारी पक्षातील नेते, पालिका अधिकारी व कंत्राटदार यांच्या संगनमताने मुंबईकरांच्या पैशांवर दरोडा टाकला जात आहे. नगरविकास खात्यातून टेंडर निघत असून हे काम कोणाला द्यायचे ते आधीच ठरलेले असते. मर्जीतील कंत्राटदारांनाच टेंडर मिळावे यासाठी काम केले जात असून मुंबईकरांचे जीवन त्रस्त करण्याचे काम महायुती सरकार करत आहे असा आरोप मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केला.

महायुती सरकार मस्त, मुंबईकर मात्र त्रस्त या अभियानांतर्गत राजीव गांधी भवन येथे वर्षा गायकवाड व प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन महायुतीवर टीका केली. या पत्रकार परिषदेत मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस, शकील चौधरी, निजामुद्दीन राईन, अजंता यादव उपस्थित होते.

UPI शुल्कावर GST? पात्र व्यापाऱ्यांना इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा करता येणार

Mumbai : स्नॅपचॅटवर मैत्री, व्हिडिओ कॉलचं रेकॉर्डिंग अन् ब्लॅकमेलिंग; तरुणीकडून ४० हजार उकळले, आरोपी पंजाबमधून अटकेत

सोने हॉलमार्किंग शुल्कात वाढ; सणासुदीच्या हंगामापूर्वी ₹४५ वरून २७५ पर्यंत भार

कृषी उत्पन्न बाजार समित्या रोजगारनिर्मितीचे केंद्र बनवणार; पणन मंत्री जयकुमार रावल यांचे प्रतिपादन

Thane : शासकीय रुग्णवाहिकांची डिझेलसाठीची धावपळ थांबणार! 'ड्राईव्ह ट्रॅक प्लस' कार्डमुळे इंधनाची अडचण दूर होणार