संग्रहित छायाचित्र  
मुंबई

BMC च्या कामात आधी कंत्राटदार ठरतो; वर्षा गायकवाड यांची टीका

मुंबई महापालिका ही भ्रष्टाचाराचे कुरण बनली असून सत्ताधारी नेते, अधिकारी आणि कंत्राटदार संगनमताने मुंबईकरांच्या पैशांवर दरोडा टाकत आहेत. नगरविकास खात्यातील टेंडर आधीच ठरलेल्या कंत्राटदारांना मिळत असून महायुती सरकार मुंबईकरांचे जीवन त्रस्त करत असल्याचे आरोप मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केले.

Swapnil S

मुंबई : मुंबई महानगरपालिका भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे. सत्ताधारी पक्षातील नेते, पालिका अधिकारी व कंत्राटदार यांच्या संगनमताने मुंबईकरांच्या पैशांवर दरोडा टाकला जात आहे. नगरविकास खात्यातून टेंडर निघत असून हे काम कोणाला द्यायचे ते आधीच ठरलेले असते. मर्जीतील कंत्राटदारांनाच टेंडर मिळावे यासाठी काम केले जात असून मुंबईकरांचे जीवन त्रस्त करण्याचे काम महायुती सरकार करत आहे असा आरोप मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केला.

महायुती सरकार मस्त, मुंबईकर मात्र त्रस्त या अभियानांतर्गत राजीव गांधी भवन येथे वर्षा गायकवाड व प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन महायुतीवर टीका केली. या पत्रकार परिषदेत मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस, शकील चौधरी, निजामुद्दीन राईन, अजंता यादव उपस्थित होते.

महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणात बृजभूषण शरण सिंह निर्दोष; दिल्ली न्यायालयाचा मोठा निर्णय

नागपुरात मैत्रीला काळीमा! ३ हजारांच्या उधारीपायी मित्रालाच संपवलं, दोघे अटकेत

Mumbai Ganesh Aagman 2026 : बाप्पाच्या आगमनाला सुरुवात! लालबाग-परळमध्ये जल्लोष; अनेक मूर्ती गुजरातकडे रवाना, VIDEO

आयटीमध्ये आता नवीन रोजगार नाही; AI आणि डेटा सेंटर उभारणीसाठी गुंतवणूक होत आहे - श्रीधर वेम्बू

CSMT वर स्मार्ट डिजिटल डिस्प्ले प्रणाली; गाडीची अद्ययावत माहिती एका नजरेत उपलब्ध