मुंबई

तरुणीचा रिप्लाय न आल्यामुळे तरुणाची आत्महत्या

बुधवारी रात्री सुरजने त्या मुलीला खूप मेसेज केले होते, परंतु तिने उत्तर दिले नाही. उत्तर न आल्याने सूरज वैतागला

प्रतिनिधी

ठाणे शहरातील चितळसर- मानपाडा येथील एका २२ वर्षीय तरुणाने प्रेमप्रकरणातून २२ जून रोजी सकाळी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. दरम्यान, प्रेमात अपयशी झाल्यामुळे तरुणाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

गुरुवारी सकाळी सुरज सुनील वाघमारे या २२ वर्षीय तरुणाने ठाणे येथील नातेवाइकांच्या घरात पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. प्रेमात अपयशी सूरजने हे टोकाचे पाऊल उचलले. तो ठाणे (पश्चिम) येथील पोखरण रोड येथे पूजा पॅथॉलॉजी लॅबमध्ये कामाला होता. त्याच्या शेजारीच राहणाऱ्या एका २० वर्षीय तरुणीवर त्याचे प्रेम होते; मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात भांडणे सुरू होती.

बुधवारी रात्री सुरजने त्या मुलीला खूप मेसेज केले होते, परंतु तिने उत्तर दिले नाही. उत्तर न आल्याने सूरज वैतागला होता. त्यातच गुरुवारी त्याने नातेवाईकाच्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी चितळसर-मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश घोडे म्हणाले की, अद्याप आम्हाला घटनास्थळावरून कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. याप्रकरणाचा तपास सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Mumbai : लोकल प्रवासात फेरीवाल्यांची अधिकृत एन्ट्री? पश्चिम रेल्वेकडूनही हालचाली सुरू; मात्र प्रवाशांकडून तीव्र विरोध

RBIच्या कारवाईनंतर Paytmचे स्पष्टीकरण; ॲप आणि UPI सेवा सुरूच राहणार, वाचा सविस्तर

Mumbai : पालिकेचे २००० सालाआधीचे, नंतरचे फोटोपासही ग्राह्य धरणार; पात्रता सर्वेक्षणातील ‘अनिर्णित’ धारावीकरांना मोठा दिलासा

मेहता-सरनाईक वाद चिघळला; सर्व तक्रारींची सखोल चौकशी करा, परिवहन मंत्र्यांचे आयुक्तांना पत्र

दूध भेसळ रोखण्यासाठी AIचा वापर करा; मुख्यमंत्र्यांच्या राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाला सूचना