मुंबई

लव्ह जिहादच्या आरोपांखाली वांद्रे स्थानकाबाहेर तरुणाला मारहाण ; वारिस पठाण म्हणाले...

या तरुणाची मैत्रीण यावेळी जमावाला विरोध करताना दिसत आहे. हा जमाव तरुणाला मारहाण केल्यानंतर स्थानकाबाहेर ओढून...

नवशक्ती Web Desk

वांद्रे टर्मिनस येथे तरुणीसोबत बाहेर गेलेल्या तरुणाला लव्ह जिहादच्या आरोपाखाली बेदम मारहाण करण्यात आली असल्याचा आरोप माजी आमदार वारिस पठाण यांनी केला आहे. पठाण यांनी ट्विट करत हा व्हिडिओ शेअर केला आहे. वांद्रे पोलिसांनी या प्रकरणी अज्ञातांविरोधातगुन्हा दाखल केला आहे.

मंगळवारी मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेर तरुणीसोबत फिरायला गेलेल्या तरुणाला लव्ह जिहादचा आरोप करत जमावाने बेदम मारहाण केली. हा मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतं आहे. या व्हिडिओत लाल शर्ट घातलेल्या एका तरुणाला जमावाकडून मारहाण होताना दिसत आहे. या तरुणाची मैत्रीण यावेळी जमावाला विरोध करताना दिसत आहे. हा जमाव तरुणाला मारहाण केल्यानंतर स्थानकाबाहेर ओढून नेताना या व्हिडिओत दिसत आहे. यानंतर जमावाकडून 'जय श्री राम'च्या घोषण देखील दिल्या जात असल्याचं या व्हिडिओ दिसत आहे.

माजी आमदार वारिस पठाण यांनी या घटनेचा निषेध नोंदवला असून मुंबईत अशी घटना घडते हे अतिशय लाजीरवाणं असल्याचं म्हटलं आहे. वांद्रे स्थानकारव लव्ह जिहादच्या नावाखाली जेएसआरचा नारा देणाऱ्या हिंदुत्ववादी गुंडांनी एका नि:शस्त्र मुस्लिम मुलाला निर्दयपणे मारहाण केली. आरपीएफच्या कर्मचारी देखील या ठिकाणी उपस्थित होता. तरी देखील कोणतीही अॅक्शन घेण्यात आली नाही. देशाच्या ७७ व्या स्वातंत्र्य दिनी हा प्रकार घडत असल्याचं पठाण म्हणाले.

यावेळी बोलताना पठाण म्हणाले की, जर काही गुन्हा केला असेल तर त्यासाठी पोलीस प्रशासन आहे. कायदा हातात घेण्याचा अधिकार कुणालाही नाही. मुंबई पोलीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माझी विनंती आहे की, व्हिडिओतील मारहाण करणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करा. तसंच हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं.

८९ हजार कोटींच्या गुंतवणुकीला चालना; पाच अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन, २० हजार प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार

देशात उष्णतेचा कहर; वाढत्या तापमानात पंतप्रधान मोदींचे नागरिकांना आवाहन, पुरेसे पाणी प्या आणि 'या' गोष्टींची काळजी घ्या

Mumbai : मुलुंड डम्पिंग ग्राऊंडला युद्धाचा फटका; डिझेलच्या कमतरतेमुळे काम करणे अशक्य, कचरा वाहून नेण्यासाठी होतेय अडचण

Mumbai : मध्य रेल्वेकडून दरवाढीचा प्रस्ताव रद्द; रेल्वे स्टॉलवरील वडा पाव-समोसा जुन्याच किंमतीत मिळणार

Mumbai : लोकलमध्ये दाम्पत्य विसरले १० लाखांच्या दागिन्यांची बॅग; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे ऐवज सापडला