राष्ट्रीय

लिबियातील अडकलेले १७ भारतीय मायदेशी परतले

शहरात राहत होते तेथे त्यांना जेवण, पाणीही मिळाले नाही

नवशक्ती Web Desk

नवी दिल्ली : लिबियात अडकलेले १७ भारतीय तरुण मायदेशी परतले आहेत. आपल्या आई-वडिलांना भेटल्यानंतर ते भावुक झाले होते.

लिबियात अवैधरीत्या प्रवेश केल्याने तेथील पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. बहुतांशी तरुण हे पंजाब व हरियाणाचे आहेत.

लिबिया पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्यापूर्वी लिबियाच्या जवारा शहरात काही शस्त्रसज्ज गटाने त्यांना अनेक महिने ताब्यात ठेवले होते.

दिल्ली, पंजाबच्या काही ट्रॅव्हल्स एजंटनी इटलीत आकर्षक नोकरी देण्याची लालूच दाखवली होती. त्या मोहाला बळी पडून ते अवैधरीत्या लिबियात पोहोचले. एजंटनी त्यांच्याकडून लाखो रुपये कमवले.

हे तरुण फेब्रुवारी २०२३ मध्ये दुबई, इजिप्तमार्गे भारतातून इटलीला रवाना झाले. काही दिवसांनंतर ते लिबियात उतरले. ते जुवारा शहरात राहत होते तेथे त्यांना जेवण, पाणीही मिळाले नाही. तसेच त्यांना मारहाण केली.

Mumbai : लोकल प्रवासात फेरीवाल्यांची अधिकृत एन्ट्री? पश्चिम रेल्वेकडूनही हालचाली सुरू; मात्र प्रवाशांकडून तीव्र विरोध

RBIच्या कारवाईनंतर Paytmचे स्पष्टीकरण; ॲप आणि UPI सेवा सुरूच राहणार, वाचा सविस्तर

Mumbai : पालिकेचे २००० सालाआधीचे, नंतरचे फोटोपासही ग्राह्य धरणार; पात्रता सर्वेक्षणातील ‘अनिर्णित’ धारावीकरांना मोठा दिलासा

मेहता-सरनाईक वाद चिघळला; सर्व तक्रारींची सखोल चौकशी करा, परिवहन मंत्र्यांचे आयुक्तांना पत्र

दूध भेसळ रोखण्यासाठी AIचा वापर करा; मुख्यमंत्र्यांच्या राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाला सूचना